नेपाळ-तिबेट सीमेजवळ हिमस्खलनामुळे पाणी, खडक, चिखल-मातीचा मोठा लोंढा मध्य नेपाळमधील गावांमध्ये शिरून घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले, तर अनेक जलविद्युत प्रकल्पांचेही नुकसान झाले. भोटेकोशी नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने आणखी पुराचा धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Nepal Flood : माझा नवरा अंथरुणाला खिळलाय, त्याला सोडून एकटी कशी जगू? महाप्रलयाचे इशारे, नेपाळी महिलेचा घराबाहेर पडण्यास इन्कारनेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमीकरण व व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ६६९ जणांचा मृत्यू झाला आहे. तिबेटच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागानुसार, तिथे सात जणांचा मृत्यू झाला. शोध आणि बचावकार्यासाठी ११ हजारहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये पाच हजारहून अधिक नेपाळी लष्कराचे जवान आहेत.
जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांतून १९१ कामगारांना बाहेर काढण्यात आले आहे. धुंचे आणि त्रिशूली येथील आपत्कालीन आरोग्य केंद्रांत १,७०६ पूरग्रस्तांवर उपचार झाले. दरम्यान, मुग्लिंग-काठमांडू महामार्ग शनिवारी पुन्हा सुरू झाला असला तरी मध्य नेपाळमधील अनेक रस्ते अजूनही पुर आणि भूस्खलनाच्या धोक्यामुळे विस्कळीत आहेत.
Nepal Flood Help: नेपाळला नक्की मदत हवी की नको? मदत नको म्हणाल्यानंतर घेतला यू टर्न आता परराष्ट्र मंत्र्यांचे नवीनच विधानभारताचे ११ जणांचे बचाव पथक नेपाळमध्ये
भारताचे ११ सदस्यीय बचाव पथक शनिवारी नेपाळमध्ये दाखल झाले. या पथकात वैद्यकीय कर्मचारी आणि बोगदा बचाव तज्ज्ञांचा समावेश आहे. नेपाळ सरकारच्या विनंतीवरून हे पथक पाठवण्यात आले. रासुवा व मध्य नेपाळात मोठे नुकसान झाले आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी नेपाळने भारत आणि चीनकडे ४२ बेली पूल उभारण्यासाठी मदत मागितली आहे.
या इंजिनीअरला पुरस्कार द्या! भीषण पुरातील घर पाहून आश्चर्याचा धक्का; VIDEO चा शेवट पाहून जग चकितनेपाळच्या अध्यक्षांकडून भारताचे आभार
नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पौडेल यांनी शनिवारी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानले. नेपाळमधील विनाशकारी आकस्मिक पुरानंतर भारत सरकारने व्यक्त केलेली चिंता, मदत आणि ऐक्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. नेपाळ सरकार आणि जनतेतर्फे ही कृतज्ञता व्यक्त करत असल्याचे अध्यक्षांच्या कार्यालयाने ‘एक्स’वर म्हटले.
मुंबईतील ६१ जणांचा ठावठिकाणा नाहीच
मुंबई : मुंबईतील ६१ जणांचा कैलास मानसरोवर यात्रेकरूंचा गट नेपाळ-तिबेट सीमाभागातील आकस्मिक पुरानंतर बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. डॉक्टर-गिर्यारोहक मिलिंद चितळे आणि त्यांच्या पत्नी जान्हवी यांच्या नेतृत्वाखालील हा गट २३ ऑगस्टला मुंबईहून काठमांडूकडे रवाना झाला होता. २५ ऑगस्टच्या संध्याकाळनंतर त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. हा गट पुरापूर्वी चीनमध्ये गेला होता की, नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

