नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात आतापर्यंत ३३२ जणांचा जीव गेला आहे. बेपत्ता असलेल्यांचा आकडा १००० च्या पुढे असल्यानं जीवितहानी वाढण्याची भीती आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली: नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर बेपत्ता झालेल्यांचा आकडा १००० ते १३०० जणांच्या दरम्यान आहे. हा आकडा पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या नैसर्गिक संकटानं कोलकात्याचे अनिंद्य मुखर्जी पुरते हादरून गेले आहेत. अनिंद्य यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी जो भाग पाहिला, जिथे वास्तव्य केलं, त्याच परिसरात पुरानं अक्षरश: थैमान घातलं. अनिंद्य ज्या गावात ३ रात्री थांबले, ते गाव आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे.
अनिंद्य मुखर्जी काही दिवसांपूर्वीच कैलास-मानसरोवर यात्रा करून परतले. यात्रेदरम्यान त्यांनी नेपाळच्या याच भागातून प्रवास केला. ‘दीड महिन्यांपूर्वी आम्ही एका गावात तीन रात्र मुक्काम केला. आता ते गाव नैसर्गिक आपत्तीमुळे बेचिराख झालं आहे. जिथे आम्ही तीन रात्री छान घालवल्या, तिथे आता सगळं काही उद्ध्वस्त झालं आहे. हा सगळा प्रकार सुन्न करणारा आहे,’ अशा शब्दांत अनिंद्य यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटेकाशी नदीच्या पात्रात प्रचंड भूस्खलन झालं. या दुर्घटनेनंतर अनेक जण बेपत्ता झाले. त्यात कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेल्या भारतीय भाविकांचाही समावेश आहे. ही बातमी कानावर पडताच अनिंद्य यांनी दीड महिन्यांपूर्वी त्यांनी केलेला प्रवास आठवला.
आमचा प्रवास आता सुरू असता तर काय झालं असतं, असा प्रश्न अनिंद्य यांना पडला आहे. ‘मी, माझे मित्र, नातेवाईक, सगळे त्याच मार्गानं गेले होते. मी तिथे असतो, तर माझं काय झालं असतं? फक्त कल्पना करूनही जीव घाबरा होतो. मीदेखील नैसर्गिक आपत्तीचा बळी ठरलो असतो. आज आमची कबर तिथे असती,’ असं अनिंद्य म्हणाले.
हिमालय परिसरात सातत्यानं नैसर्गिक संकटं येत आहेत. त्याबद्दल अनिंद्य यांनी चिंता बोलून दाखवली. अचानक पूर, ढगफुटी, भूस्खलन यासारख्या घटना सातत्यानं होत आहेत. हे सगळे निसर्गाचे संकेत आहेत. पण माणसाला ते संकेत समजत आहेत का, हा खरा प्रश्न आहे, असं म्हणत अनिंद्य यांनी सगळ्यांनाच अंतर्मुख करणारा प्रश्न विचारला.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा