Headlines

Nashik Sangamner Pune Railway Project Cancelled Project Stopped Due to Technical Difficulties; तीन दशकांचे स्पन्न भंगले! नाशिक-संगमनेर-पुणे रेल्वे प्रकल्पाला रेड सिग्नल, प्रकल्पाचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात; कारण काय?


Nashik Sangamner Pune Railway Project Halted : विशेष म्हणजे, २०२० पासून या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली होती. यासाठी ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वितरित करण्यात आल्याचे सांगितले जाते. प्रकल्प मार्गी लागण्याच्या आशा निर्माण झालेल्या असतानाच तो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Nashik Sangamner Pune Railway Project Halted
नाशिक संगमनेर पुणे रेल्वेमार्ग प्रकल्प रद्द(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, नाशिक : उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्याच्या विकासाचा कणा मानल्या जाणाऱ्या पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वे प्रकल्पाला अखेर ब्रेक लागल्याची माहिती समोर आली आहे. तीन दशकांपासून प्रतीक्षेत असलेला हा महत्त्वाकांक्षी मार्ग रद्द करण्याच्या निर्णयामुळे सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर, आंबेगाव, नारायणगाव आणि खेड परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, विकासाच्या अपेक्षांनाही धक्का बसला आहे.

प्रकल्पाचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात

जीएमआरटी (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणींचा दाखला देत रेल्वे मंत्रालयाने पुणे-संगमनेर-नाशिक सरळ रेल्वेमार्ग रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त समोर आल्यानंतर विविध स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक वर्षांपासून निवडणुकांच्या जाहीरनाम्यांपासून ते सार्वजनिक व्यासपीठांपर्यंत गाजलेल्या या प्रकल्पाचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात गेल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.
Maharashtra TimesAyodhya Poul Patil : नागेशमामा, सोबत कोण आहेत सांगू का? ठाकरेसेनेने बंडखोर खासदारांना डिवचलं, तुमच्या ‘वर्मा’त हात घातल्यासारखे होईल!
या रेल्वेमार्गामुळे सिन्नर आणि चाकण ही राज्यातील महत्त्वाची औद्योगिक केंद्रे थेट जोडली जाणार होती. त्यामुळे मालवाहतुकीचा खर्च कमी होऊन उद्योगांना नवी गती मिळाली असती. याशिवाय हजारो रोजगारनिर्मितीबरोबरच विद्यार्थी, व्यापारी आणि प्रवाशांसाठीही प्रवास अधिक सुलभ झाला असता. दरम्यान, या निर्णयाचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला बसणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या लासलगावहून मुंबईला रेल्वेमार्गाने कांदा पाठविण्यासाठी प्रति टन सुमारे २५० रुपये खर्च येतो. मात्र, रेल्वे सुविधा नसल्याने सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर व आंबेगाव परिसरातील शेतकऱ्यांना त्याच मालाच्या वाहतुकीसाठी प्रति टन २,५०० ते ३,००० रुपये मोजावे लागतात. रेल्वेमार्ग अस्तित्वात आला असता, तर शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चात मोठी बचत झाली असती.
Maharashtra TimesPune News : लग्नासाठी 14 कोटींचा महाल बूक, पण त्याआधीच आक्रित; होणाऱ्या पत्नीसोबत लोहगडावर ट्रेकिंग, पुण्यातील तरुणाचा वेदनादायी शेवट

भावी पिढ्यांचा विकास हेच प्राधान्य

केंद्र सरकारने विकास प्रकल्पांचा विचार करताना केवळ आर्थिक नफा-तोट्याचा विचार न करता जनतेचे हित आणि भावी पिढ्यांचा विकास हेच प्राधान्य ठेवले पाहिजे. नाशिक-सिन्नर-संगमनेर मार्गे प्रस्तावित असलेला नाशिक-पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द केल्याने नाशिक, अहिल्यानगर, पुणे जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला मोठा धक्का बसला असून, या असंवेदनशील निर्णयाचा आपण जाहीर आणि तीव्र निषेध करीत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली. त्याचबरोबर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या भूमिकेवर कठोर शब्दांत टीका केली आहे, त्याचबरोबरीने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही यात लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा