Nashik District Collector Ayush Prasad : ‘गंभीरचंद सुरंजे यांची सहज विचारपूस केली असता त्यांची समस्या लक्षात आली. हे काम लगेच होणार होते. त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांना बोलावून घेत विषय मार्गी लावला. हे नियमित प्रशासकीय काम असून वेगळे काहीच नाही’, असं नाशिकचे डॅशिंग जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटलं आहे.

जिल्हाधिकाऱ्यांची संवेदनशीलता
देवळाली येथे भीमाबाई गंभीरचंद सुरंजे यांच्या मालकीची मिळकत आहे. ही मिळकत भोगवटादार वर्ग दोनमधून भोगवटादार वर्ग १ (क वर्ग सत्तप्रकार) मध्ये रुपांतरित करण्याकरीता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर केला. यावरील कार्यवाहीची माहिती घेण्याकरीता ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या चढत होते. त्याचवेळेस जिल्हाधिकारी प्रसाद पायऱ्या उतरत होते. त्यांनी सुरंजे यांची विचारपूस केली. तसेच पायऱ्या चढून वर जाण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत कार्यालयाच्या आवारातील वडाच्या झाडाखाली पारावर बसविले. निवासी उपजिल्हाधिकारी राजपूत यांना लॅपटॉपसह पाराजवळ येण्याची सूचना केली. राजपूत तत्काळ तेथे आले. प्रकरण अंतिम करून नजराणा भरण्याकरीता सुरंजेंना चलन देण्यात आले.
Pune News: शिवरायांच्या गड-किल्ल्यांची सफर घरबसल्या करता येणार; ऐतिहासिक जागांची माहितीही मिळणार, काय आहे नवा उपक्रम?
अडीच हजारी दर्शनासाठी रांगा
शुक्रवार ते रविवार या सलग शासकीय सुट्ट्यांचा लाभ घेत भाविकांनी त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. २०० रुपये सशुल्क दर्शनासाठी जास्त गर्दी असून, देवस्थानने गत महिन्यात सुरू केलेल्या अडीच हजार रुपये ‘व्हीआयपी’ दर्शनालाही गर्दी होत आहे. भाविकांकडून अडीच हजार रुपये देणगी पावती घेऊन त्यांना थेट सभामंडपाच्या उत्तर दरवाजात सोडले जाते. तथापि, तेथे पूर्व दरवाजा मोफत दर्शनबारीने आलेले भाविक रांगेत असतात. त्यात २०० रुपये तिकीट घेऊन त्या रांगेतून आलेले भाविकदेखील सभामंडापच्या उत्तर दरवाजाने सोडलेले असतात. गर्भगृहासमोर अडीच हजार रुपये देऊन आलेल्या भक्ताच्या हातात असलेली देणगी पावती पाहून त्याला दर्शनासाठी हात जोडण्याची संधी दिली जाते.
Byculla Moharram : मुंबईच्या इतिहासातील सर्वांत मोठा विषप्रयोग; मोहरममध्ये उंदीर मारण्याच्या गोळ्या, भायखळ्यात 30 हजार भाविकांना संपवण्याचा कट
मंदिराच्या बाहेर मंडप टाकून अडीच हजार रुपयांचे देणगी दर्शन घेणाऱ्या भाविकांना उभे राहण्याची अथवा बसण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, मंडपाबाहेर रांग लागते, तेथे काही वेळा तास दोन तास थांबावे लागते. त्यानंतर आणि मंदिरात दर्शनबारीत सोडल्यानंतर इतर भाविकांप्रमाणे दर्शन घेऊन बाहेर पडावे लागते. साहजिकच अडीच हजार रुपये देऊन होणारे ‘व्हीआयपी’ दर्शन भाविकांना फारसे पसंत पडत नसल्याचे चित्र आहे. सोमवारी पालखी प्रस्थान असल्याने तेव्हाही त्र्यंबकनगरीत गर्दी राहणार आहे. मंगळवारनंतर गर्दीत काहीसा उतार पडण्याचा अंदाज आहे.

