- Marathi News
- Opinion
- Nanditesh Nilay Column: Late By 2 Mins, Daughter Loses Doctor Dream | Maharashtra News
4 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

दररोज केवळ तीनशे रुपये कमावणाऱ्या एका वडिलांनीमुलीच्या डोळ्यांत डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले वत्यासाठी कर्ज घेण्यासही मागेपुढे पाहिले नाही. मात्र तेमुलीला वेळेत नीटच्या परीक्षा केंद्रावर पोहोचवू शकलेनाहीत. अल्प उत्पन्न असलेल्या त्या वडिलांनी मुलीसोबतसत्तर किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. पण ते दोन मिनिटेउशिरा पोहोचले. परिणामी, त्या मुलीचे व तिच्यावडिलांचे सर्व विनवण्या, आक्रोश व अश्रू निरर्थक ठरले.कारण परीक्षा नियमांनुसार चालते. परीक्षा केंद्रावरीलसुरक्षारक्षकाला स्पष्ट आदेश होते की, निर्धारित वेळेनंतरएक मिनिट उशीर झाला तरी परीक्षार्थीला उशिरा आलेलेमानले जाईल आणि प्रवेश दिला जाणार नाही.
हताश झालेले वडील जमिनीवर कोसळले होते. मुलगीत्यांना बिलगून रडत होती. मात्र, संस्थेच्या भिंतीनिःशब्दपणे फक्त घड्याळाकडे बोट दाखवत सांगतहोत्या की, तुम्ही उशिरा आलात. मग तो उशीर फक्त दोनमिनिटांचाच का असेना. एक मिनिटाचाही उशीर म्हणजेउशीरच असतो. वेळेचे महत्त्व काय असते हे जाणूनघ्यायचे असेल, तर जपानकडे पाहावे.
जपानमध्ये वेळेचे काटेकोर पालन हा त्यांच्या संस्कृतीचामहत्त्वाचा भाग आहे. त्याला ‘जिकन-गेन्शु’ म्हणजेवेळेचे कठोर पालन असे म्हटले जाते. वेळेवर पोहोचणेही केवळ शिस्तबद्ध जीवनशैली नसून तुमची वाटपाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दलचा आदर मानला जातो. हेइतरांविषयीची जाणीव आणि विश्वास यांच्याशीहीजोडलेले आहे. जपानमध्ये वेळ पाळणे म्हणजेदुसऱ्याच्या वेळापत्रकाचा सन्मान करणे व तेथील प्रत्येकसंस्था तसेच नागरिकांच्या वर्तनात हे दिसून येते. रेल्वेप्रशासन व सरकारी अधिकारी किरकोळ विलंबाबद्दलहीजाहीर माफी मागतात. तेथील सार्वजनिक वाहतूकव्यवस्था वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध आहे. बस किंवारेल्वेला काही मिनिटे उशीर झाल्यास अधिकृत विलंबप्रमाणपत्र दिले जाते. ते प्रवासी कार्यालयात किंवा शाळेतसादर करू शकतात. मात्र, त्या वडिलांकडे असेकोणतेही प्रमाणपत्र नव्हते. त्यांच्याकडे फक्त एक मानवीसत्य होते की, पावसाच्या अडथळ्यांनंतरही ते वेळेतपोहोचण्याचा प्रयत्न करत होते. नियमांनुसार ते उशिराआले होते. पण परीक्षा केंद्राकडूनही संवेदनशीलतादाखवण्यात उशीर झाला. लोकशाहीतील शेवटचा माणूसदोन मिनिटांच्या उशिरामुळे पराभूत झाला.
या घटनेने मुख्यतः दोन प्रश्न उपस्थित केले आहेत. पहिलाम्हणजे आपल्या देशात वेळेचे पालन हा सामाजिकसंस्कार का बनू शकत नाही? आणि दुसरा म्हणजे काहीविशेष परिस्थितीत उशिराच्या नियमांमध्ये लवचिकताअसू शकत नाही का? परीक्षा केंद्रांवर एखाद्याअपवादात्मक परिस्थितीत एक-दोन मिनिटांची सवलतदेणे अशक्य आहे का? कारण कोणताही परीक्षार्थीजाणीवपूर्वक एक-दोन मिनिटे उशिरा पोहोचण्याचीयोजना आखणार नाही. त्याहूनही महत्त्वाचा प्रश्न म्हणजेआपण वेळेला किती आदर देतो? देशात वेळेबाबत अशीनिष्ठा आहे का? बैठका वेळेवर सुरू होऊन वेळेवरसंपतात का? एखाद्याला वाट पाहायला लावल्यानेआपल्याला अपराधी वाटते का? की वेळेचे बंधनकाहींसाठी कठोर आणि काहींसाठी लवचिक असते?
त्या वडिलांना आणि त्यांच्या मुलीला विश्वास होता की,माणुसकी व माणसाची करुणा अजूनही जिवंत आहे.त्यांच्या विनवण्या ऐकून कुणाचे तरी मन पिळवटूनजाईल, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही.त्या मुलीचे एक वर्ष वाया गेले. तिच्या आयुष्यातील एकावर्षावर दोन मिनिटांचा विलंब अवजड ठरला. (लेखकाचे हे वैयक्तिक मत आहे.)
