Alibaug Ferry Service Closed from May 25 : मुंबईकरांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. 25 मेपासून फेरी सेवेला थांबा मिळणार आहे. येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवासी बोटींच्या सुरक्षिततेला धोका
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात समुद्रातील मोठ्या लाटा, वादळी वारे आणि खराब हवामान लक्षात घेऊन प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात अरबी समुद्र खवळत असल्याने प्रवासी बोटींच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रवासी जलवाहतूक बंद करण्यात येत असल्याचे महाराष्ट्र सागरी मंडळाने स्पष्ट केलं आहे.
Pune Crime : गर्लफ्रेंडच्या आईसोबत प्रेमसंबंध, आईच्या बॉयफ्रेंडचा तरुणीला संबंध तोडण्याचा सल्ला; रागातून पुण्यात तरुणाला मध्यरात्री संपवलं
काही प्रवाशांना दिलासा
पीएनपी, मालदार, अजंठा तसेच इतर खासगी कंपन्यांच्या गेटवे-मांडवा मार्गावरील फेरी बोटी 26 मे ते 31 ऑगस्टदरम्यान बंद राहणार आहेत. मात्र, मांडवा ते भाऊचा धक्का दरम्यानची रो-रो सेवा सुरू राहणार असल्याने वाहनधारक आणि काही प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच दिघी-आगरदांडा मार्गावरील जेट्टी वाहतूकही सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईकरांसाठी अलिबाग हे अत्यंत लोकप्रिय पर्यटनस्थळ मानलं जातं. कमी वेळात, कमी खर्चात आणि समुद्रमार्गाच्या रोमांचक अनुभवामुळे गेटवे ते मांडवा फेरी सेवेला वर्षभर मोठी मागणी असते. विशेषतः शनिवार-रविवार आणि सुट्ट्यांच्या काळात हजारो पर्यटक या मार्गाने अलिबाग, नागाव, काशिद, मुरुड यांसारख्या पर्यटनस्थळांकडे रवाना होत असतात. मात्र, आता पुढील तीन महिने ही सेवा बंद राहणार असल्यानं पर्यटकांना रस्तेमार्गाचा आधार घ्यावा लागणार आहे.
पर्यटकांच्या नियोजनावर परिणाम
फेरी बंदीमुळे अलिबागचा प्रवास तुलनेनं अधिक वेळखाऊ आणि खर्चिक होण्याची शक्यता आहे. मुंबईहून रस्तेमार्गानं अलिबाग गाठण्यासाठी अधिक वेळ लागत असल्यानं अनेक पर्यटकांच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. याचबरोबर रायगड जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायालाही या बंदीचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. स्थानिक हॉटेल व्यावसायिक, रिसॉर्ट चालक, दुकानदार आणि पर्यटनाशी संबंधित व्यवसाय मोठ्या प्रमाणावर या जलवाहतुकीवर अवलंबून असतात.
NEET Paper Leak Shubham : नीट पेपरफुटी प्रकरणात शुभमबाबत मोठी अपडेट; प्रतिविद्यार्थी किती पैसे? BAMSची परीक्षा दिली नसल्याचं स्पष्ट, पाच वर्षांपासून अनुपस्थित
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने संबंधित कंपन्यांना अधिकृत पत्र पाठवून पावसाळी हंगामात सेवा बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच प्रवाशांनी 25 मेपूर्वी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे आणि पावसाळ्यात सुरक्षित पर्यायांचा वापर करावा, असं आवाहनही प्रशासनानं केलं आहे. दरम्यान, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर हवामानाचा आढावा घेऊन पुन्हा फेरी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मांडवा बंदर विभागाकडून देण्यात आली आहे.

