Headlines

Mumbai Ahmedabad Bullet Project: भारत बेजबाबदार! दिलेला शब्द पाळत नाही! महत्त्वाकांक्षी प्रकल्पास विलंब; जपानचे माजी मंत्री भडकले


Mumbai Ahmedabad Bullet Project: भारत बेजबाबदार असून दिलेली आश्वासनं पाळत नाही, अशा शब्दांत जपानच्या माजी मंत्र्यांनी भारतावर टिकेची झोड उठवली आहे. महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला विलंब झाला आहे. त्यासाठी त्यांनी भारताला जबाबदार धरलं आहे.

india japan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
टोकियो: जपानच्या माजी मंत्र्यांनी बुलेट ट्रेन प्रकल्पावरून भारत ावर गंभीर आरोप केले आहेत. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी झालेल्या विलंबावरून त्यांनी भारतावर गंभीर आरोप केले आहेत. भारत बेजबाबदार असून आश्वासनं पूर्ण करत नाही, असे सनसनाटी आरोप करत जपानच्या माजी मंत्र्यांनी खळबळ उडवून दिली आहे.

मी स्वत: भारतात शिंकानसेन प्रकल्पाशी (मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प) संबंधित होतो. पण या प्रकल्पात काही गोष्टी मला खटकल्या. आंतरराष्ट्रीय बैठका आणि चर्चांमध्ये भारताकडून बराच विलंब झाला. भारताकडून प्रचंड बेजबाबदारपणा झाला,’ असे आरोप जपानचे माजी मंत्री हिदेकी माकिहारा यांनी केले.
Maharashtra TimesBoats Capsized in Bay of Bengal: बंगालच्या उपसागरात 2 बोटी बुडाल्या; 500 जण दगावल्याची भीती; समुद्रात आक्रोश अन् आरडाओरडा
जपानचे माजी मंत्री युरोपियन सिग्नलिंग यंत्रणा, ट्रेन सेट खरेदी आणि तांत्रिक हस्तांतरण यावरुन भारतावर संतापले आहेत. भारतानं जपानच्या ऐवजी युरोपमधून सिग्नलिंग यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ट्रेन सेटची निर्मिती स्वत: करण्याचा निर्णय घेतला आहे.

जपानच्या माजी मंत्र्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. ‘काहीही झालं तरी ते आश्वासनं पूर्ण करत नाहीत. शब्द दिलाच असेल तरीही ते त्यापासून मागे हटतात. शब्द पाळत नाहीत. ते अखेरपर्यंत केवळ स्वत:च्या फायद्याच्या गोष्टी करत राहतात. जबाबदार मंत्र्यांचा पवित्रा तर अतिशय वाईट होता. जर सर्वात मोठ्या अधिकाऱ्याचाच पवित्रा असा असेल, तर कोणताही संवाद नीट होऊ शकत नाही,’ असं माजी मंत्र्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
Maharashtra TimesUS Iran Conflict: ट्रम्पकडून ‘तो’ प्रस्ताव मागे, USचा इराणच्या गंडस्थळावर हल्ला; ड्रोन्स, मिसाईल्सचा तुफान मारा
‘या प्रकल्पात जपानच्या अनेक लोकांनी स्वत:ला झोकून दिलं. त्यांच्यासाठी मी हे लिहितोय. हा प्रकल्प पुढे जाऊ शकत नाही याची १०० टक्के जबाबदारी भारताची आहे. पंतप्रधान ताकाइची यांच्या दौऱ्यातूनही काही हाती लागलं नाही. भारत शिंकानसेन प्रकल्प फेल: सुरक्षेसाठी महत्त्वाच्या सिग्नल यंत्रणेपासून जपानला बाहेर ठेवण्यात आलं,’ अशा शब्दांत माजी मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

जपानच्या माजी मंत्र्यांच्या संतापाचं कारण काय?
प्रकल्पाला झालेल्या विलंबामुळे खर्चात ८० टक्क्यांची वाढ झाली आहे. या प्रकल्पावरील खर्च १.१ लाख कोटीवरून १.९८ लाख कोटींवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर जपानच्या माजी मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.