Manoj Jha On Aamir Khan : आमिर खाननं सोनम वांगचुक यांच्याबद्दल भाष्य केलं, तसेच त्याच्या ‘३ इंडियट्स’ या सिनेमातील भूमिकेबद्दलही सांगितलं. आता अभिनेत्यावर खासदार मनोज झा यांनी टीका केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘3 इडियट्स’ चित्रपटातील ‘फुंगसुक वांगडू’ या भूमिकेबद्दल आमिर खाननं दिलेल्या स्पष्टीकरणामुळे एक नवीन राजकीय चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते, कार्यकर्ते आणि सोशल मीडिया युजर्सनी आमिर खानच्या प्रतिक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सोनम वांगचुक यांच्यावरील आमिर खानच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.
पुढे, ‘आमरण उपोषण, उपोषण यासारखी आंदोलनं ज्या सरकारमध्ये संवेदना आहे त्यांच्यावर फरक पाडते. ज्या सरकारमधील संवेदना संपली असेल किंवा मेली असेल तिथं लोकशाहीचं हत्यारं काम करत नाहीत. लढाई मोठी आहे, प्रवास लांबचा आहे, त्यामुळे सध्या सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडावं.’ असं मनोज झा म्हणाले. Ujjwal Nikam : ‘अलका याग्निक आणि अनुराधा पौडवाल यांच्यातील वादसुद्धा त्यांच्या मृत्यूचं कारण’, गुलशन कुमार मृत्यूप्रकरणी काय म्हणाले उज्ज्वल निकम? आमिर खान म्हणाला की, ‘सिनेमा करत असताना सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहिती नव्हतं. ओमीचा व्हिडिओ पाहिला पण त्यात तो चुकलाय, त्याला कदाचित वाटलं असेल पण, मला राजकुमार हिरानी किंवा लेखक अभिजीतला याबाबत माहिती नव्हतं. मला वाटतं की आम्हा सर्वांना त्यांच्या आरोग्याची खूप काळजी आहे. मी आशा करतो की, सर्व काही ठीक होईल. मला आशा आहे की ते त्यांचं उपोषण लवकर संपवतील आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतील.’
Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली
दरम्यान, ‘३ इडियट्स’ हा सिनेमा २००९ मध्ये प्रदर्शित झालेला आणि आजही हा सिनेमा आवर्जून पाहिला जातो.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा