Mohan Joshi Struggle : मोहन जोशी यांनी नाटकासाठी नोकरी सोडलेली आणि घर चालवण्यासाठी त्यांनी टेम्पोचा व्यवसाय सुरू केलेला. याबद्दल त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – सुप्रसिद्ध मराठी अभिनेते मोहन जोशी यांनी अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. मात्र, मोहन जोशी यांचा इंडस्ट्रीतील प्रवास सोपा नव्हता. नाटकाच्या वेडापायी मोहन जोशी यांनी नोकरी सोडलेली. नुकत्याच एका मुलाखतीत मोहन जोशी यांनी त्यांचा संघर्षकाळ सांगितला आहे.
मोहन जोशी यांनी सांगितला संघर्षकाळ
मोहन जोशी म्हणाले की, ‘मी किर्लोस्करमध्ये कामाला होतो. तिथे खेर साहेब होते. माझ्या खूप सुट्ट्या व्हायच्या. तेव्हा मी ‘घरोघरी हीच बोंब’ नावाचं शरद तळवळकरांचं नाटक करायचो. त्याचे खूप प्रयोग व्हायचे. २८ दिवसांचा कोकण दौरा होता. २८ दिवस करायचं काय, पत्र पाठवायचं माझी आजी वारली, मी इथे तेरावं घातल्याशिवाय येऊ शकत नाही. तेरा दिवस सुट्टी. तेरा दिवस संपले, चौदाव्या दिवशी आजी वारली, तिचं तेरावं, परत सुट्टी २६ दिवस झाले, परत आजी वारली. सर म्हणाले, ‘अरे तुमच्या आज्या तरी किती आहेत.’ मी म्हटलं, तीन आहेत. तिन्ही गेल्या, वडिलांची आई, आईची आई आणि आईची बहिण. ते म्हणाले, ‘एक काम करा. तुम्ही बंडल मारताय, खोटं बोलताय मला माहितीये. मी तुम्हाला जाहिरात दाखवतो.’ जाहिरात दाखवली. मला म्हणाले, ‘राजीनामा द्या नाहीतर नोकरी करा.’ म्हटलं मी राजीनामा देतो. त्याच दिवशी राजीनामा दिला आणि घरी आलो.’
Radhika Deshpande : ‘करकचून बांधलेली कंचुकी घातलीस, समोर बसलेल्या बॉयफ्रेंडचं नशीब उजळलं, जाहिरातीत त्याला भाऊ म्हटलं नाहीस’, क्रितीवर संतापली मराठी अभिनेत्री ‘नुकतंच आमचं लग्न झालं होतं आणि मुलगीही झाली होती, त्यामुळे जबाबदारी वाढली होती. म्हटलं मी राजीनामा दिला. आता करणार काय? माझ्या डोळ्यांसमोर अंधार होता. मला काही सुचलं नाही. माझा मोठे भाऊ इंजिनिअर होता. तो मार्गदर्शक. तो म्हणाला, ‘सोडली नोकरी, काळजी करू नको. ट्रान्सपोर्ट लाइन सुरू कर.’ म्हटलं गाडी? गाडीची किंमत ९७,००० होती. तर म्हणाला, ‘तू पैसे जमव, काय कमी पडले तर मी देतो.’ सासूबाई WDC मध्ये होत्या. त्यांनी अकरा हजार दिले, साडू बँक ऑफ बडोदामध्ये होता. तिथून लोन काढलं. तीन हजार दिले आणि गाडी घेऊन आलो. माझा एकही पैसा नाही. गाडी आणली मलेरिया झाला, महिनाभर आजारी, महिनाभर घरीच. टेम्पो घरीच.’
देऊळ बंद २ वेळी पायात बाभळीचा काटा रुतला, पाय बधिर झाला; मोहन जोशींनी किस्सा सांगितला
‘नाटक सुरू होतं, प्रयोग तुफान होते. ७५ रुपये नाईट होती. पैसे येत होते पण त्यात संसार भागत नव्हता. मीच ड्राइव्ह करायचो, त्यानंतर पुढच्या ४ वर्षात मी आणखी २ टेम्पो विकत घेतले. मी स्वत: माल भरायचो, उतरवायचो, टेम्पोवर ताडपत्री देखील बांधायचो. लोडेड गाडी मी बाहेर लावायचो, एक सीन करायचो आणि सांगायचो मी आलोच असं म्हणायचं आणि गाडी घेऊन बेळगावला जायचो. बेळगाववरून बालगंधर्वला जायचं, प्रयोग करायचा आणि दुसऱ्या दिवशी तालमीला यायचो.’ असं मोहन जोशी यांनी शेवटी सांगितलं. ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत मोहन जोशी बोलत होते.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा