Headlines

Maharashtra Monsoon Death: धो-धो नव्हे, जीवघेणा पाऊस! गेल्या महिनाभरात अनेकांनी गमावला जीव, राज्यात पावसाचे बळी किती? – maharashtra monsoon deaths 2026 heavy rains alives 137 died drowing electrocution


Maharashtra Monsoon Death: सध्या राज्यात १७ एनडीआरएफ आणि सहा एसडीआरएफ अशी एकूण २३ बचाव पथके तैनात असून, संभाव्य आपत्तींचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याचे सादरीकरणात नमूद आहे.

monsoon death
राज्यात पावसाचे बळी(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी परिस्थिती गंभीर झाली असून, जुलै महिन्यात जवळपास १३७ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. विभागाने या संदर्भातील अहवाल मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केल्याचे कळते. या मृत्यूंपैकी वीज पडून सर्वाधिक ५३ जणांचा जीव गेला, तर भिंती कोसळणे, झाडे पडणे, पुरात वाहून जाणे आणि दरडी कोसळणे या घटनांमुळेही मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे.

राज्यात यंदाच्या मान्सूनमध्ये अनेक भागांत मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यातून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा आढावा सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्या वेळी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने सादर केलेल्या सविस्तर सादरीकरणात जुलै महिन्यातील दुर्घटनांची आकडेवारी मांडण्यात आली.

Maharashtra TimesMumbai BEST Bus: ‘बेस्ट’चा होणार कायापालट! मुंबईतील 22 बस आगारांच्या आधुनिकीकरणाचा निर्णय
२८ जुलै ते तीन ऑगस्ट या कालावधीतच राज्यात पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये २२ जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. ठाणे जिल्ह्यात इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना सर्वाधिक गंभीर ठरली. याशिवाय यवतमाळ, धुळे, बुलढाणा आणि सोलापूर जिल्ह्यांत पुराच्या पाण्यात वाहून जाण्याच्या घटनांमुळेही जीवितहानी झाली आहे.

५०५ जनावरांचा मृत्यू
कारण मृत्यू
वीज पडून—- ५३
भिंत पडून—- ३५
झाड पडून—- २१
पुरात वाहून—- २१
दरड कोसळून—- ७
एकूण—- १३७

Maharashtra Timesपनीरसारखे दिसणारे ‘अ‍ॅनालॉग’ हद्दपार! साठवणूक, वाहतूक, वितरणावर एक वर्षासाठी प्रतिबंध; FDAचा निर्णय
५०५ जनावरांचा मृत्यू
जुलै महिन्याच्या कालावधीत राज्यभरात ५०५ प्राण्यांचा मृत्यू झाला असल्याची नोंद या अहवालात करण्यात आली आहे. या अहवालानुसार या कालावधीत वीज पडून, गारपीट, झाड पडून, भिंत पडून आणि आग लागून या जनावरांच्या झालेल्या मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

धरणांतील मंगळवारचा पाणीसाठा
धरण— उपयुक्त पाणीसाठा (टीएमसीमध्ये)— टक्केवारी
खडकवासला १.९७— १००
पानशेत १०.६५— १००
वरसगाव १२.८२— १००
टेमघर ३.६६— ९८.६४
भामा आसखेड ७.५६— ९८.६६
पवना ८.२७— ९७.१४
मुळशी १७.९८— ९७.४२
चासकमान ७.५३— ९९.३६
नीरा देवघर ११.४५— ९७.६४
भाटघर २३.५०— १००
वीर ९.२१— ९७.८५
कोयना ८७.२४— ८९.४३
उजनी ५२.२२— ९७.६४
जायकवाडी ६८.५६—८९.४३
भंडारदरा १०.२१— ९५.०४
(स्रोत : जलसंपदा विभाग, राज्य सरकार)

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा