Headlines

Mumbai BEST Bus: ‘बेस्ट’चा होणार कायापालट! मुंबईतील 22 बस आगारांच्या आधुनिकीकरणाचा निर्णय


मुंबई : बेस्ट उपक्रमाला संचित तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सुमारे २८ हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मदतीने बेस्ट आगारांचा कायापालट करण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.

हा प्रस्ताव आता मंजुरीसाठी मुंबई महापालिकेकडे आणि त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाकडे पाठवला जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत २२ आगारांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून, ३६ हजार खासगी कार पार्किंगसाठी जागा, क्रीडा व सांस्कृतिक सुविधा, व्यावसायिक तसेच सार्वजनिक संकुले उभारण्याचा प्रस्ताव आहे.

Maharashtra TimesCyber Crime: ‘म्युल अकाउंट’ प्रकरणात मोठा मासा गळाला; 150 कोटींच्या सायबर फ्रॉडचा पर्दाफाश, 65 नागरिकांना गंडवलं, प्रकरण काय?
बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी बेस्ट समिती सदस्यांसमोर या कायापालट प्रकल्पाचे सादरीकरण केले. या प्रकल्पासाठी सल्लागार नेमून निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. तसेच सविस्तर प्रकल्प अहवालही तयार केला जाईल, अशी माहिती सेठी यांनी बैठकीत दिली. या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत याआधी सविस्तर चर्चा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. बेस्टची संचित तूट सात हजार ३२२ कोटी रुपये असून एकूण दायित्व १४ हजार ३२३ कोटी रुपये आहे. भविष्यात बेस्ट उपक्रम स्वमालकीच्या पाच हजार बस खरेदी करणार आहे.

Maharashtra TimesBullet Train: खारफुटींवर कुऱ्हाड; बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी 847 झाडे तोडण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी
या बसचे संचालन, तसेच कामगार आणि संघटनांच्या मागण्यांमुळे उपक्रमावर अतिरिक्त १३ हजार ५६१ कोटी रुपयांचा भार येणार आहे. त्यामुळे सध्याच्या आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी एकूण २८ हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून स्पष्ट करण्यात आले.

परिवहन विभाग तोट्यात
बेस्ट उपक्रमाचा परिवहन विभाग तोट्यात आहे. २०२५-२६मध्ये प्रतिदिन प्रवासीसंख्या २० लाख ९५ हजार आहे. तूट २,१९६ कोटी रुपये आहे. दुसरीकडे, बेस्टचा विद्युत विभाग फायद्यात आहे. या विभागाचे उत्पन्न ४,६२४ कोटी रुपये असून, खर्च ४,५०९ कोटी रुपये आहे.

बेस्टच्या ताफ्यात दीड हजार बस येणार
मुंबई : बेस्ट उपक्रमाने प्रवाशांसह बेस्ट कर्मचारी, कामगारांना दिलासा देणारे निर्णय घेत मंगळवारी चार महत्त्वाचे प्रस्ताव मंजूर केले. यामध्ये दीड हजार मिडी एसी बस १२ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेण्याच्या निर्णयाचा समावेश आहे. तर, कायमस्वरूपी कामगारांना आणि कंत्राटी चालक, वाहकांनाही अंतरिम वाढ देण्याच्या दोन प्रस्तावांनाही समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

अपेक्षित फायदे…
-आगार संकुलांचे आधुनिकीकरण करून
१० हजार बेस्ट बसगाड्यांची व्यवस्था
-सर्व बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थाने सुधारणार
-क्रीडा, सांस्कृतिक सुविधा, कला केंद्र व संग्रहालयाचे नियोजन
-आरोग्य, शिक्षण इमारतीही उभारणार

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत