#kolhapurrain #kolhapurrainnews #panchgangariver #farmerकोल्हापुरात गेल्या दोन ते तीन दिवसात जोरदार पावसाने शहरासह परिसरात हजेरी लावली आहे. यामुळे शहर परिसरात काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले. मात्र पाणीटंचाईचे सावट असलेल्या कोल्हापूरकरांची चिंता आता मिटली आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण परिसरात मुसळधार पाऊस कोसळू लागला आहे. जिल्ह्यात जून महिन्यात आतापर्यंत सरासरी 119 मि.मी. नोंद झाली असून, हवामान विभागाने 5 जुलैपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. धरण परिसरात कोसळणाऱ्या पावसामुळे धरण आणि नद्यांच्या पाणीपातळीमध्ये हळूहळू वाढत आहे.