Haridwar Kawad Yatra: कावड यात्रेमुळे हरिद्वारमध्ये गंगाजल भरण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीचा फायदा घेत काही विक्रेते प्लास्टिकच्या बाटल्या आणि डबे तब्बल १०० रुपयांना विकत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.

नेमकं काय घडतेय?
हरिद्वारमधील हा व्हिडीओ skpradhan.in या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गंगा नदीच्या किनाऱ्यावर भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे. आणि या गर्दीचा फायदा विक्रेते घेत आहेत. पाणी भरण्यासाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या ८० ते १०० रुपयांना विकल्या जात आहेत. लक्षवेधी बाब म्हणजे ज्या बाटल्या प्लास्टिकच्या दुकानात १०-१५ रुपयांना मिळतात, त्याच बाटल्यांसाठी १० पट किंमत भाविक मोजत आहेत. अन् आश्चर्य म्हणजे देवाच्या नावाखाली ते दुप्पट-तिप्पट पैसे खर्च करत आहेत, याची जाणीवदेखील बहुतांशी लोकांना नाही, असं देखील या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
कावड यात्रेसाठी भाविकांची गर्दी
हा व्हिडीओ १९ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच, या व्हिडीओवर नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत. कोणी म्हणतंय, ‘लोकांच्या श्रद्धेचा बाजार केलाय,’ तर कोणी २० रुपयांची साधी पाण्याची बाटली खरेदी करून त्यामध्ये गंगाजल भरण्याची युक्ती सुचवत आहे. असो, या व्हिडीओवर तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या. तुमचं काय मत आहे?
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

