देशात चालवली जातेय विशेष ट्रेन
मुळात, देशभरातील वाढत्या कांद्याचा भाव लक्षात घेता देशात कांद्याचा पुरवठा वाढवण्यावर भर दिला जात आहे. सरकारी Buffer Stock बाजारात आणला जात आहे. तसेच देशातील अशा शहरांमध्ये कांद्याचा पुरवठा वाढवण्यात येत आहे, ज्या शहरात कांद्याचा भाव सरासरी किंमतीपेक्षाही जास्त आहे. अशा शहरांमध्ये कांदा पुरवठा वाढवण्यासाठी नाशिकहून कांदा एक्सप्रेस सोडण्यात येत आहे. दिल्ली, चेन्नई, कोची तसेच गुवाहाटी या शहरांच्या दिशेने कांदा एक्सप्रेस रवाना झाली आहे.
देशात कांद्याचा किंमती का वाढल्या?
मुळात, महाराष्ट्र राज्य कांदा पुरवठादार म्हणून ओळखला जातो. कांद्याच्या किंमत वाढीला कारणीभूत पुरवठ्यात असणारी मंदी आहे. कांद्याचा पुरवठा कमी झाला आहे कारण बाजारात मुबलक कांदा उपलब्ध नाही. रबी हंगामात झालेल्या गारपीट तसेच अवकाळी अतिवृष्टीमुळे रबी कांद्याचे उत्पादन कमी झाले. अशात देशात मान्सूनची एंट्रीही उशिरा झाली त्यामुळे खरीफ कांद्याच्या पेरणीत उशीर झाला. या दोन कारणांमुळे कांदा पुरवठीचे संपूर्ण गणित कोलमडले आणि देशाला Buffer Stock बाजारात आणण्याचा निर्णय घ्यावा लागला.
कांदा एक्सप्रेस चार मोजक्याच शहरांत का चालवली जात आहे?
कांद्याचा वाहतुकीसाठी चालवण्यात येणारी कांदा एक्सप्रेस सुरुवातीला दिल्ली, गुवाहाटी, चेन्नई आणि कोची या शहरांच्या दिशेने चालवण्यात येत आहे. नाशिकहून या चार शहरांच्या दिशेने कांदा एक्सप्रेस रवाना केली जात आहे. मुळात, या चारही शहरांमध्ये कांद्याच्या किंमती सरासरी किंमतीपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे येथे कांदा पुरवठ्यात वाढ करणे कांद्याच्या वाढत्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी गरज बनली आहे.
July 2026 DA Hike: जुलै महिन्याची DA वाढ कोणत्या वेतन आयोगानुसार, 7 वा की 8 वा? तुमच्या पगारावर होणारा परिणाम समजून घ्याकांदा उत्पादक जिल्हा नाशिकही कांद्याच्या वाढत्या किंमतीने त्रस्त
देशाचा कांदा पुरवठादार म्हणून महाराष्ट्र राज्याकडे पाहिले जाते तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त कांदा पिकवणारा जिल्हा म्हणजे नाशिक. देशभरात कांद्याच्या किंमती वाढत असताना प्रमुख कांदा उत्पादक नाशिकही सारख्याच समस्येने त्रस्त आहे. मे 2026 महिन्यांत नाशिक जिल्ह्यात 11.50 रुपये प्रति किलोग्राम किंमतीने विकला जाणारा कांदा ऑगस्ट 2026 महिन्यात 24.14 रुपये प्रति किलोग्राम किंमतीने विकला जात आहे.

