Headlines

Indra Nooyi India Remarks Controversy; अमेरिका, चीनचे कौतुक भारत अस्वच्छ, भारतात असते तर सीईओ झाले नसते! इंदिरा नूई यांच्या विधानामुळे नवा वाद


Indra Nooyi on India vs China: अमेरिकन कंपनी पेप्सिकोच्या माजी सीईओ आणि अध्यक्षा इंद्रा नूई यांनी भारताची चीनशी तुलना करताना “अराजक देश” असे वर्णन केल्यानंतर सोशल मीडियावर वादाला तोंड फुटले. त्यांनी अमेरिकन कार्यसंस्कृतीची प्रशंसा केली आणि म्हणाल्या की, त्या भारतात असत्या तर त्या इतक्या मोठ्या कंपनीच्या सीईओ कधीच बनू शकल्या नसत्या. नूयी यांनी चीनला भारतापेक्षा श्रेष्ठ असल्याचेही म्हटले.

“भारत सर्वांनाच आवडेल असे नाही,” असे पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा आणि सीईओ इंद्रा नूई यांनी म्हटले आहे. अमेरिकेत स्थायिक होण्यापूर्वी इंद्रा नुई यांचा भारतात जन्म झाला आणि इथेच लहानाच्या मोठ्या झाल्या. “मात्र, तुम्हाला गोंधळ आवडत असेल आणि येथील जीवनशैली तुम्हाला समजत असेल, तर तुम्हाला या देशाची भुरळ पडेल,” असे नूयी म्हणाल्या.

“असा विचार करा की, एक NRI इथे रिकाम्या हाताने येतो आणि एका मोठ्या अमेरिकन कंपनीचा सीईओ बनतो. जगात इतर कुठेही असे घडू शकत नाही, अगदी भारतातही मी सीईओ झाले नसते.”

पुढे नुई म्हणतात.

इंद्रा नुईंनी केली अमेरिकेची प्रशंसा
इंदिरा नूईंनी अमेरिकेचा जगातील सर्वोत्तम देश म्हणून उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, “अमेरिका गुणवत्तेवर आधारित प्रणालीवर चालतो. त्या भारतातून आल्या नसत्या, तर त्या इतक्या मोठ्या कंपनीच्या सीईओ कधीच झाल्या नसत्या. भारतात राहून असं यश मिळवणे अशक्य होते.”

इंद्रा नुई नेमकं काय म्हणाल्या…
हूवर इन्स्टिट्यूशनसाठी Condoleezza Rice यांच्याशी नेतृत्व आणि नवोन्मेष या विषयावर बोलताना नूई यांना राईस यांनी विचारले की, “अमेरिकन विद्यार्थी चीनला जातात पण भारताला तितकेसे जात नाहीत, हे पाहता, त्यांना भारताला भेट देऊन अनुभव घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याकरिता त्या काय सांगतील?”
Maharashtra TimesIncome Tax Return: तुम्ही आगाऊ टॅक्स तर भरत नाहीत ना? ITR मध्ये मिळू शकते 60000 पर्यंतची कर सवलत, नक्की काय करावं लागेल समजून घ्या
“चीनबद्दलची एक मनोरंजक गोष्ट मला वाटतं की तो तुलनेने एकसंथ देश आहे. ठीक आहे, तिथे चिनी भाषेचे वेगवेगळे प्रकार असू शकतात, पण तुलनेने एकसंध देश आहे. पर्यटक म्हणून जाऊन काही काळ घालवणं भारतापेक्षा चीनमध्ये जास्त सोपं आहे.”

“भारत एक अस्ताव्यस्त देश आहे. भारत गोंधळलेला देश आहे, भारताचं सौंदर्य गोंधळातच आहे, पूर्ण गोंधळात. आणि तुम्हाला भारताबद्दल माहिती असेल, यापूर्वी इथे प्रवास केला असेल आणि तुम्हाला आजूबाजूला गोंधळ आवडत असेल, तर तुम्ही पुन्हा-पुन्हा इथे याल. हे एखाद्या अमली पदार्थासारखे आहे, तुम्हाला त्याची सवय लागते,” असे नूई म्हणाल्या. नुई यांनी पुढे भारतातील कॉर्पोरेट क्षेत्राच्या कार्यसंस्कृतीवरही टीका केली आणि म्हटले की, ‘येथे प्रतिभेला महत्त्व दिले जात नाही, या बाबतीत अमेरिका खूपच सरस आहे.’

त्याचप्रमाणे नुई यांनी भारतातील स्ट्रीट लाइफबद्दलही भाष्य केले, विशेषतः वाहनांच्या बरोबर रस्त्यावरून चालणाऱ्या गाईंचा त्यांनी उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, “शिस्त आणि स्वच्छ परिसर पसंत करणाऱ्या आणि पहिल्यांदाच भारतात येणाऱ्या पर्यटकांना अशी दृश्ये कदाचित गोंधळात टाकू शकतात, पण अनेक भारतीयांसाठी ही परिस्थिती त्यांच्या दैनंदिन जीवनाचाच एक अविभाज्य भाग आहे.”
Maharashtra TimesAI Data Centers: AI चा गेम ओव्हर? 79 टक्के डेटा सेंटर्ससमोर ब्लॅकआऊटचं संकट; दिग्गज टेक कंपन्यांना धडकी भरली
नुई म्हणतात की, ‘ही वेळही टळून जाईल’ अशी अनेक भारतीयांची वृत्ती आहे आणि अव्यवस्थेला देशाच्या सामाजिक जडणघडणीचाच एक भाग मानून स्वीकारतात.

चीन संघटित, तर भारत अस्वच्छ
नुई यांनी भारत आणि भारतातील लोकांच्या जीवनशैलीवरही टीका केली. त्या म्हणाल्या की, “तुम्हाला संघटित जीवन जगायचे असेल, तर तुम्हाला भारत आवडणार नाही. या बाबतीत तुम्हाला चीन अधिक सुव्यवस्थित वाटेल, कारण तेथील लोकांनाही पद्धतशीर जीवन जगायचे आहे. भारतात तुम्हाला रस्त्यावर जनावरे फिरताना दिसतील, पण येथील लोकांनी या गोंधळातही टिकून राहण्याचा मार्ग शोधला आहे.”

नुई यांनी चीनला सांस्कृतिकदृष्ट्या अधिक संघटित असल्याचेही वर्णन केले आणि सांगितले की, या देशातील बहुतेक लोक एकाच धर्माचे पालन करतात, त्यामुळे तुम्हाला फिरणं सोपं असून या बाबतीत भारत अधिक गुंतागुंतीचा आहे.

…तरीही एक गोष्ट भारताची मोठी ताकद
नुई पुढे म्हणतात की चीनमध्ये केंद्रीकरण असले आणि विकास आराखडा अधिक सरस असला तरी, आज चीन एक महासत्ता बनला असो. आपल्या विकास आराखड्याद्वारे लाखो लोकांना गरिबीतून बाहेर काढले असेल, पण त्यांच्याकडे लोकशाहीची ताकद नाही. या क्षेत्रात भारत नेहमीच पुढे राहील आणि हीच भारताची सर्वात मोठी ताकद आहे.

भारतात प्रत्येकाला आपली मते व्यक्त करण्याचा अधिकार असल्यामुळे तिथे प्रगती मंद आहे. जेव्हा असं घडतं तेव्हा प्रगतीचा वेग मंदावतो, पण हीच भारताची सर्वात मोठी ताकद आहे. अमेरिकेप्रमाणेच भारतातही लहान-मोठ्या प्रत्येक शहरात न्यायालये आहेत, ज्यामुळे लोकांना त्यांच्या हक्कांची खात्री पटते. या बाबतीत चीन मागे आहे कारण तेथे सर्व निर्णय सरकारद्वारे घेतले जातात, असे नुई म्हणाल्या.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत