Headlines

IND vs ZIM : अरे काय रे! भारताने झिम्बाब्वेवर एकहाती विजय मिळवला, पण कॅप्टन सिकंदरने दिलं भलतंच कारण: काय म्हणाला?


Sikandar Raza Marathi News : भारताने पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वे संघाला पाणी पाजलं. सात विकेटने विजय मिळवत मालिकेत १- ० ने विजयाची सुरूवात केली आहे. या सामन्यानंतर झिम्बाब्वेचा कर्णधार रझा याने पराभवाचं वेगळंच कारण दिलं आहे.

Sikander Raza
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : टी-२० वर्ल्ड कप विजेतेपदानंतरचा पहिला आंतरराष्ट्रीय विजय अखेर भारतीय क्रिकेट संघाने नोंदवला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील आठव्या सामन्यात भारताला विजय मिळाला. झिम्बाब्वे संघ भारताला फारसे आव्हान देऊ शकला नाही. मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात भारताने झिम्बाब्वेवर ७ विकेट आणि ४० चेंडू राखून दणदणीत विजय मिळवला. या सामन्यात झालेल्या पराभवानंतर झिम्बाब्वे संघाचा कर्णधार सिकंदर रझा याने खेळपट्टीला जबाबदार ठरवलं आहे.

सिकंदर रझा काय म्हणाला?

मला वाटतं की खेळपट्टी दर्जेदार नव्हती, सकाळच्या आद्रकतेचा परिणाम झाला होता. पण तो इतका वेळ टिकेल असे वाटले नाही. नवीन चेंडूने फलंदाजी करणं अवघड होतं. पण दुर्देवाने आम्ही पॉवर प्ले मध्ये चौकार मारू शकलो नाही. भारत जेव्हा फलंदाजीला आला त्यावेळी खेळपट्टी एकदम बरोबर होती आणि ती बराच वेळ टिकून राहिली होती. आशा करतो की पुढच्या सामन्यात आम्हाला चांगली खेळपट्टी मिळल. टॉस हरलो तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. मारूमणी आणि माधेवेरे यांनी चांगली फलंदाजी केली आणि सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवलं. आम्ही सकारात्मक घेऊ आणि पुढे पहिल्यांदा फलंदाजी केली तरी स्पर्धात्मक धावसंख्या उभारू शकू, असं सिकंदर म्हणाला.
Maharashtra TimesSachin Tendulkar : शॉर्टकटची संस्कृती देशाच्या भविष्याला कमकुवत करते, विद्यार्थांच्या भावना समजून घेण्यासारख्या- सचिन तेंडुलकर
सामनावीर मयांक यादवने सुरुवातीलाच झिम्बाब्वेच्या फलंदाजांना हादरे दिले, तर वैभव सूर्यवंशीने अवघ्या १८ चेंडूंत अर्धशतक झळकावत भारताचा विजय सोपा केला. हरारे स्पोर्ट्स क्लब मैदान वैभवसाठी खास ठरले आहे. याच मैदानावर त्याने १९ वर्षांखालील वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात ८० चेंडूंत १७५ धावांची खेळी केली होती. त्याच मैदानावर त्याने पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतकही साजरे केले.
Maharashtra TimesIND vs ZIM 1st T20 : मन मोठं लागतं! कॅप्टन झाल्यावर मिळालेल्या पहिल्या विजयाचे दोघेच शिलेदार, श्रेयस अय्यरने जाहीरपणे घेतली नावे, पाहा कोण?
भारताने या मालिकेसाठी नवोदितांना अधिक संधी दिली आहे. शिवम दुबे वगळता भारतीय संघातील वेगवान गोलंदाजांकडे मिळून अवघ्या सात आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव होता. मात्र मयांक यादव आणि प्रिन्स यादव या यादव द्वयीने झिम्बाब्वेचे आघाडीचे फलंदाज स्थिरावू दिले नाहीत. झिम्बाब्वेची अवस्था ४ बाद ३२ अशी झाली होती. मयांक आणि प्रिन्स यांनी मिळून आठ षटकांत केवळ ३७ धावा देत चार विकेट घेतल्या. यानंतर वेस्ली मॅधेवेरे आणि तादिवानाशा मारुमणी यांनी सहाव्या विकेटसाठी ३७ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. त्यांनी शिवम दुबे आणि रवी बिश्नोई यांना लक्ष्य केले. या भागीदारीमुळे झिम्बाब्वेला १२५ धावांपर्यंत मजल मारता आली.
Maharashtra TimesMayank Yadav : 19 चेंडूंत अर्धशतक करूनही वैभवला पुरस्कार नाही; मयंक यादवच का ठरला सामनावीर?
हरारे स्टेडियमवर भारतीय पाठीराख्यांची संख्या लक्षणीय होती. त्यांना भारतीय फलंदाजीची उत्सुकता होती आणि वैभव सूर्यवंशीने त्यांना दिली. त्याने पॉवरप्लेमध्येच १७ चेंडूंत ४८ धावा फटकावल्या. पुढील चेंडूवर त्याने अर्धशतक पूर्ण केले. मात्र वैभव अखेरपर्यंत टिकू शकला नाही. ईशान किशनने २४ चेंडूंत ३५ धावा करत श्रेयस अय्यरसह भारताचा विजय अधिक सोपा केला. श्रेयसने नाबाद २८ धावांची संयमी खेळी करत भारताला १३.२ षटकांत विजय मिळवून दिला.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा