Headlines

Income Tax Notice Case Of Mr. Rathi ; बँक खात्यात होती 54 लाखांची रक्कम जमा! आयटीआर भरणे टाळले, नोटीशी केल्या दुर्लक्षित; शेवटी काय घडलं? ते पहाच


हरियाणा राज्यातील रहिवासी मिस्टर राठी यांना 14 वर्षानंतर एक मोठ्या तणावातून सुटका मिळाली आहे. आयकर विभागाकडून आलेल्या नोटीशीना दुर्लक्षित केल्यामुळे त्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. 2019 साली विभागाकडून नोटीशी येण्यास सुरुवात झाली. पण जेव्हा उत्पन्नावरचा कर वाढवण्यात आला, तेव्हा राठी यांना जाग आली. अखेर, मोठ्या कसरतीनंतर राठी यांना या संपूर्ण प्रकरणातून सुटका मिळाली आहे.

ITR Viral Case Of Unexplained Cash Deposite
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हरियाणा राज्यात इन्कम टॅक्स विभाग आणि करदात्यामध्ये बँकेच्या रक्कमेवरून मोठा गोंधळ उडाला होता. हा गोंधळ इतका तीव्र झाला की ते सुटण्यासाठी तब्बल 14 वर्षांचा काळ लागला. हरियाणा राज्याच्या रोहटक जिल्ह्यात राहणारे मिस्टर राठी हे एक प्रॉपर्टी डीलर आहेत. 2011-12 च्या सुमारास त्यांनी खात्यात जमा केलेल्या 54 लाख रोख रक्कमेने त्यांना पुढील 14 वर्षांसाठी न्यायालयीन प्रक्रियेत अडकवले. इन्कम टॅक्स विभागाकडून नोटीशीवर नोटीशी येऊ लागल्या. आधी या नोटीशी दुर्लक्षित केल्या गेल्या पण नंतर याच नोटीशीमुळे मिस्टर राठी यांच्या रात्रीची झोप उडू लागली. इन्कम टॅक्स विभागात नुसतीच्या फेऱ्या मारण्यात त्यांचे दिवस जाऊ लागले. शेवटी नुकतेच राठी यांना या सगळ्या प्रकरणातून मुक्तता मिळाली आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

प्रकरण असे आहे की मिस्टर राठी प्रॉपर्टी डीलर आहेत. त्यामुळे प्रॉपर्टीचा विक्रेता आणि ग्राहक यांच्या मध्ये मध्यस्थीचे काम ते गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. 2011-12 च्या दरम्यान, एका प्रॉपर्टी डीलमध्ये ग्राहकाकडून प्रॉपर्टी विकत घेण्यासाठी राठी यांना 54 लाखांची रक्कम देण्यात आली. राठी यांनी ती रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली. पुढे तीच रक्कम विक्रेत्याच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली.

बँकेत जमा करण्यात आलेली रक्कम ही राठी यांची नव्हती. परंतु, 2019 मध्ये आयकर विभागाच्या लक्षात आले की राठी यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या खात्यात 54 लाखांची रक्कम जमा केली होती. या उत्पन्नाची नोंद त्यांनी संबंधित आयकर विभागात केली नाही. तसेच या रक्कमेवर लागणाऱ्या टॅक्सपासूनही स्वतःचा बचाव केला. या दरम्यान, आयकर विभागाने राठी यांना अनेका नोटीशी पाठवल्या. राठी यांनी त्या नोटीशीला दुर्लक्षित केले. त्यावर काहीच उत्तर नोंदवला नाही. नोटीशीला राठी यांच्याकडून काहीच उत्तर न मिळाल्यामुळे शेवटी आयकर अधिकाऱ्यांनी त्या 54 लाखांना अघोषित उत्पन्न म्हणून घोषित केले आणि राठी यांच्या करपात्र उत्पन्नात जोडण्यात आले. यामुळे राठी यांच्यावर कराची जबाबदारी वाढली.

वाढलेले कर लक्षात घेताच राठी यांनी आयकर विभागाकडे धाव घेतली. राठी यांनी CTI-A कडे तक्रार केली पण तिथे त्यांना दिलासा मिळाला नाही. पुढे राठी यांनी ITAT दिल्ली येथे धाव घेतली. तिथे या संपूर्ण प्रकरणावर मोठी तपासणी झाली. राठी यांनी 2011-12 काळात केलेले व्यवहार आणि त्या संबंधीतचे सर्व पुरावे सादर केले. त्या 54 लाख रक्कमेसंबंधित ग्राहक-विक्रेताच्या ITAT कडून नोंदी घेण्यात आल्या. ग्राहकांची 7 शपथपत्र, बँक स्टेटमेंट, बँक पासबुक तसेच 8 सेल डीड्स सादर करण्यात आले. संपूर्ण तपासानंतर 2026 मध्ये या प्रकरणातून राठी यांना मुक्तता मिळाली.

Maharashtra TimesGold Rate: 1947 पासून सोने 1726 पट महागले; 80 वर्षांत 1.53 लाखांच्या पुढे, 10 हजारांच्या सोन्याचे आज किती झाले असते?एकंदरीत, राठी यांनी मध्यस्थी म्हणून ग्राहकाकडून 54 लाख रुपये रक्कम घेतली आणि ती स्वतःच्या बँक खात्यात डीपोजिट करून पुढे विक्रेताच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आली. काही वर्षांनी ही गोष्ट आयकर विभागाच्या लक्षात आली. विभागाने नोटीशी पाठवल्या पण त्या आधी दुर्लक्षित केल्यामुळे पुढे राठी यांना अनेक वर्षांसाठी आयकर विभागाच्या फेऱ्या माराव्या लागल्या. मोठ्या तपसानंतर राठी यांची या संपूर्ण प्रकरणातून सुटका झाली आहे.

दिवेश दिनेश

लेखकाबद्दलदिवेश दिनेशदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा