Harshad Chopda : लोकप्रिय अभिनेता हर्षद चोप्रानं ‘लॉक अप’ मध्ये त्याच्या पहिल्या ब्रेकअपबद्दल सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘लॉक अप: ट्रुथ ऑर डेअर’ या रिॲलिटी शोमधील स्पर्धक एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे करत आहेत. शोच्या एका एपिसोडमध्ये, टीव्ही अभिनेता हर्षद चोप्रानं त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक किस्सा सांगितला. त्यानं खुलासा केला की, एकदा त्यानं जीव देण्याचा प्रयत्न केला होता.
हर्षद चोप्रानं स्वतःचा हात कापला
शनिवारी तीन स्पर्धक – हर्षद चोप्रा , योगेश रावत आणि सुफी मोतीवाला, एलिमिनेट झाले. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी, हर्षदनं सर्वात आधी बजर दाबला, ज्यानंतर त्याला त्याचं गुपित उघड करावं लागलं. Jennifer Winget : वयाच्या ४१व्या वर्षी सुप्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात, उद्योगपतीसोबत थाटला संसार हर्षद म्हणाला, ‘माझ्या पहिल्या रिलेशनशिपमध्ये ती थोडी नाराज होती. तिनं मला फोन करून सांगितलं की, ‘मला या रिलेशनशिपमध्ये राहायचं नाहीये’ आणि मला काहीच कळत नव्हतं. म्हणून, मी माझा हात कापला. त्याच्या खुणा अजूनही माझ्या हातावर आहेत.’ Savita Malpekar : 10 दिवस लेक कोमात, डॉक्टरांनीही आशा सोडलेली; सविता मालपेकर यांनी सांगितला प्रसंग, आलेली स्वामींची प्रचिती अभिनेता पुढे म्हणाला, ‘पण हो, काहीही झालं नाही. त्यानंतर, मी जागा झालो, घाबरलो आणि स्वतःच हॉस्पिटलमध्ये गेलो. माझ्या पायालाही दुखापत झाली होती, त्यामुळे मी चालूही शकत नव्हतो. कसकसा मी अखेर डॉक्टरकडे पोहोचलो, पण डॉक्टर म्हणाले की मला पोलिसांना कळवावं लागेल. मी त्यांना खूप विनवणी केली. त्यानंतर मी जागा झालो आणि मी स्वतःला वचन दिलं की, मी पुन्हा कधीही स्वतःला त्रास करून घेणार नाही.’
नखरेल मराठी तारकांचा माज असा उतरवतो, Mahesh Tilekar यांची सनसनाटी मुलाखत
हर्षद चोप्राने असंही सांगितलं की, आज तो ज्या घटनेचं वर्णन करत होता, त्याबद्दल त्याच्या वडिलांना आणि कुटुंबातील इतर कोणालाही माहिती नव्हती. यानंतर, हर्षद चोप्रा म्हणाला की, स्वतःचा आदर करणं महत्त्वाचे आहे. त्यानं सांगितलं की, ही घटना मुंबईत येण्यापूर्वी घडली होती आणि त्यावेळी तो २२ किंवा २३ वर्षांचा होता. हे त्याचं पहिलं रिलेशनशिप होतं. Salman Khan : थकलेले डोळे अन् बारीक शरीरयष्टी; सलमान खानला झालं तरी काय? चाहते चिंतेत, Video व्हायरल
गर्लफ्रेंड आणि जिवलग मित्रानं फसवणूक केली
यापूर्वी, शोच्या प्रीमियर एपिसोडमध्ये हर्षदने सांगितलेलं की, त्यानं एकाच वेळी त्याची गर्लफ्रेंड आणि त्याचा जिवलग मित्र गमावला होता. त्याच्या गर्लफ्रेंडने त्याला फसवलं होतं आणि ती त्याच्या जवळच्याच मित्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती. यानंतर त्याचा लोकांवरील विश्वास उडाला.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा