Headlines

Girish Mahajan Nashik:सहा महिन्यांत नाशिकचा कायापालट; पालकमंत्रीपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशिमध्ये , महाजन यांनी केला विश्वास व्यक्त


Girish Mahajan Nashik: नवनियुक्त नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर पहील्यांदाच नाशिकला भेट दिली. यावेळी नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी विकास काम सुरू असल्याने नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली तर येणाऱ्या सहा महिन्यांत नाशिकचा कायापालट करू असा विश्वास व्यक्त केला .मात्र या भेटी दरम्यान मुंबई नाका परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती.

नाशिकचा कायापालट
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वरसाठी शासनाने ३५ हजार कोटींची विकासकामे सुरू केली आहेत. सध्या खड्ड्यांमुळे नाशिककरांना त्रास होत असल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो; मात्र पुढील चार ते सहा महिन्यांनंतर नाशिकचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असा विश्वास नवनियुक्त पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

पालकमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशिकमध्ये आले

पालकमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महाजन बुधवारी (दि. १९) प्रथमच नाशिकमध्ये आले. मुंबई नाका येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्यावर दाखविलेला विश्वास विकासकामांतून सार्थ ठरवू, अशी ग्वाही महाजन यांनी दिली. ते म्हणाले, सध्या सुरू असलेली कामे केवळ तात्पुरत्या गरजा भागविण्यासाठी नसून, पुढील ४० ते ५० वर्षांचा विचार करून केली जात आहेत.

मुंबई नाका येथे जय्यत तयारी

मंत्री गिरीश महाजन यांच्या स्वागताची पक्षातर्फे मुंबई नाका येथे जय्यत तयारी करण्यात आली होती. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, भाजपच्या तिन्ही आमदारांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली. उत्तर महाराष्ट्र बैठकीत आमदार व्यग्र असल्यामुळे तेे उपस्थित राहू शकले नाहीत, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला.

पालकमंत्री गिरीश महाजनांच वक्तव्य

“नाशिक स्वच्छ,सुंदर , सुरक्षित आणि पायाभूत सुविधांनी सक्षम करण्यासह औद्योगिक व पर्यटन क्षेत्रात आघाडीचे शहर बनविण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या सुरू असलेल्या कामांसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य कारावे”

Maharashtra TimesDr Surdas on Ajit Pawar : श्रीमद्भगवद्गीता वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही, ‘इस्कॉन’च्या डॉ सूरदास यांचा दावा, अजित पवारांनाही पुस्तक दिलेलं, त्यांनी वाचलं असावं

हिमगौरी आहेर- आडके महापौर

“नवनिर्वाचित पालकमंत्री गिरीश महाजन यांचे स्वागत त्यांनी यापूर्वीही नाशिकचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे.त्यांना विकासाची जाण असून योग्य नेतृत्व मिळाल्याने नाशिकच्या विकासाला गती मिळेल”

कोंडीने मुंबई नाका दीड तास ठप्प

गर्दीमुळे वाहतूक ठप्प

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्त्यांनी मुंबई नाकापरिसरात केलेल्या गर्दीमुळे वाहतूक अर्धा तासाहून अधिक काळ ठप्प झाली. त्यानंतरही दोन तास वाहतूक विस्कळीत राहिल्याने नागरिकांचे हाल झाले.

नियोजित कामांवर पोहोचण्यास उशीर झाला

स्वागत कार्यक्रमामुळे मुंबई नाका परिसरात वाहनांचा वेग थांबला. द्वारका चौक, इंदिरानगर व काठेगल्ली सिग्नलकडून येणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या. सकाळी १० ते १२ या गर्दीच्या वेळेत हा गोंधळ झाल्याने अनेकांना कार्यालये, शाळा-महाविद्यालये आणि नियोजित कामांवर पोहोचण्यास उशीर झाला.

Maharashtra TimesNagpur News: हिंगणा अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात अडकले ; औद्योगिक क्षेत्रातील मुख्य रस्त्यांवर ट्रेलर्स , कंटेनर्स

वाहनचालक त्रस्त

या कोंडीत एक रुग्णवाहिकाही अडकली. रुग्णवाहिकेला मार्ग काढण्यासाठी चालकाला कसरत करावी लागली. वाहनचालकांनी ‘हॉर्न’ वाजवत संताप व्यक्त केला. ‘व्हीआयपी’ ताफा आल्यावर सामान्य वाहनांना थांबवून मंत्र्यांच्या गाड्यांना मार्ग मोकळा करून देण्यात येत होता. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले होते.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा