Headlines

Gadchiroli Groom dies on the fourth day after marriage; लग्नाच्या चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू; पत्नीच्या मांडीवर डोके ठेवून तरुणाने सोडला जीव


आपल्या एका मित्रासह नववधू दीपिकाला घेऊन तो दुचाकीवरून दवाखान्यात जाण्यास निघाला, परंतु रस्त्यातच त्याची प्रकृती अधिक बिघडली.

gadchiroli wedding
पत्नीसोबतचा पहिलाच प्रवास नारायणसाठी अखेरचा ठरला(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गडचिरोली: सात जन्मांची साथ देण्याची शपथ घेत गडचिरोली जिल्ह्यातील तरुण-तरुणी विवाहबंधनात अडकली. मात्र लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत पतीने पत्नीच्या मांडीवर डोके ठेवून आपले प्राण सोडले. ही घटना कोरची तालुक्यातील गहाणेगोटा येथे ३ मे रोजी सकाळी घडली.

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी की, गडचिरोलीतील नारायण कंवलसिंह बोगा या २६ वर्षीय तरुणाचे ३० एप्रिल रोजी छत्तीसगडमधील मानपूर-चौकी तालुक्यातील माधोपूर येथील फिरूराम कुमेटी यांच्या दीपिका या मुलीशी लग्न झाले होते. लग्नानंतर नारायण आणि दीपिका सुखी संसाराची स्वप्ने बघत होते. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १ मे रोजी नारायणने गावी स्वागत समारंभाचंही आयोजन केलं होतं.

स्वागत समारंभ पार पडल्यानंतर पोटात दुख असल्याने नारायण हा बेतकाठी येथील एका खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेऊन परत आला. त्यानंतर २ मे रोजी त्याची प्रकृती बरी होती. परंतु, ३ मे रोजी पुन्हा नारायणच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे आपल्या एका मित्रासह नववधू दीपिकाला घेऊन तो दुचाकीवरून दवाखान्यात जाण्यास निघाला, परंतु रस्त्यातच त्याची प्रकृती अधिक बिघडली.

दरम्यान, पोटात तीव्र वेदना होऊ लागल्याने मोटारसायकल थांबवून नारायण याने नववधूच्या मांडीवर डोके ठेवले आणि काही क्षणांतच त्याची प्राणज्योत मालवली. त्यामुळे लग्नानंतर पत्नीसोबतचा पहिलाच प्रवास नारायणसाठी अखेरचा ठरला. या दुर्दैवी घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा