E20 Petrol in India News: इथेनॉल मिश्रित पेट्रोलसंदर्भात सोशल मीडियावर दावे-प्रतिदावे केले जात आहेत आणि सरकारने या दाव्यांची दखल घेतली. सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीत केंद्र सरकारने सांगितले की “पेट्रोलमधील 20% इथेनॉल मिश्रण कार्यक्रम सध्या एक प्रयोग असून त्याचे वास्तविक परिणाम पुढील वर्षी दिसून येतील.”

इथेनॉल-मिश्रित पेट्रोलचे सरकारने काय सांगितले
सरकारने म्हटले आहे की, 20% इथेनॉल मिश्रण कार्यक्रम सध्या केवळ प्रयोग म्हणून राबवला जात असून त्याचे वास्तविक परिणाम पुढील वर्षापर्यंत समोर येतील. पश्चिम आशियातील संघर्षादरम्यान सरकारने सुरू केलेल्या कार्यक्रमाबाबत व्यापक चर्चा आणि चिंतांच्या पार्श्वभूमीवर सरकारचे विधान समोर आले असून इथेनॉलचे मिश्रण वाढवल्यास जुन्या वाहनांचे नुकसान होऊ शकते आणि इंधनाची कार्यक्षमताही कमी होण्याची अनेकजण अशी भीती व्यक्त करत आहेत.
Share Market : ये रे ये रे पैसा… 1 लाखाचे झाले 3.40 लाख; एथर एनर्जीच्या गुंतवणूकदारांना सहा महिन्यातच सुपरडुपर फायदा!
ई20 पेट्रोल, इंधन कार्यक्षमता आणि पर्यावरणावरील परिणामांना वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर सरकारने सर्वोच्च कोर्टात विधान केले. ऊर्जा सुरक्षा, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि पर्यावरणाचे संरक्षण यासाठी हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे केंद्र सरकार सातत्याने सांगत आहे.
BPCL ने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान ॲटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी यांनी सांगितले की, सरकार 20 टक्के इथेनॉल मिश्रित कार्यक्रमावर सातत्याने काम करत आहे. त्यांनी न्यायालयाला सांगितले, “20% इथेनॉल मिश्रण एक योजना आहे, ज्यावर सरकार प्रयोग करत आहे, ज्याचे परिणाम आपल्याला पुढील वर्षापर्यंत समोर येतील.” बीपीसीएलने 2025-26 च्या इथेनॉल पुरवठा वर्षासाठी इथेनॉल वाटपासंदर्भातील कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले.
Petrol-Diesel Rule Change: पेट्रोल, डिझेलच्या खरेदीवरील मर्यादा पूर्णपणे रद्द; 1 जुलैपासून संपूर्ण देशात होणार बदल, दिवसाला 200 लिटरची मर्यादा होती
E20 पेट्रोलबद्दल वाद का?
पश्चिम आशियातील युद्धामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाल्यानंतर सरकारने पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळून आयात केलेल्या कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने नवीन उपक्रम हाती घेतला. यामुळे क्रूडची आयात कमी होईल आणि ऊस व इतर पिकांच्या शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त बाजारपेठ उपलब्ध होईल, असा सरकारने दावा केला. मात्र, अनेक तज्ज्ञांनी जुन्या वाहनांच्या इंजिन क्षमता,मायलेज आणि मेंटेनन्सवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.
गेल्या वर्षी भारताने पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळण्याचे आपले लक्ष्य नियोजित वेळेच्या पाच वर्षे आधीच साध्य केले. तेल विपणन कंपन्यांनी 1 एप्रिलपासून देशभर इथेनॉल-मिश्रित पेट्रोलचा पुरवठा सुरू झाला. अशा परिस्थतीत, आता सरकारने 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण 30% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
8th Pay Commission Salary Hike: पगारवाढीच्या नावाखाली अपेक्षांवर पाणी फिरेल; किमान ₹69000 वेतन स्वप्नच, कोट्यवधी कर्मचाऱ्यांना सरकारचा देणार झटका?
E20 इंधनाच्या वापरामुळे वाहनांच्या विमा संरक्षणावर परिणाम यासारख्या शंका फेटाळून लावत केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने इथेनॉल मिश्रणाचा कार्यक्रम ‘सुरक्षित, ग्राहक-स्नेही आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर’ असल्याचे म्हटल्यानंतर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतच आज सुनावणी झाली. 24 जून रोजी मंत्रालयाने निवेदन जारी केले आणि म्हटले की E20 इंधनामुळे विमा पॉलिसी रद्द होऊ शकतात किंवा अवैध ठरू शकतात, या दाव्यांची संबंधित घटक म्हणजे स्टेकहोल्डर्ससोबत पडताळणी केली गेली आणि दावे चुकीचे असल्याचे आढळून आले.

