केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकारमध्ये जबाबदारी मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. फडणवीस यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाईल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
आषाढी एकादशीच्या महापूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस पंढरपूरहून नागपूरला परतण्याऐवजी थेट सोलापूरहून दिल्लीला रवाना झाल्याने या अफवांना आणखी जोर चढला. मात्र, आता फडणवीस दिल्लीहून परतले आहेत. रविवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका विनोदी टिप्पणीने या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला.
फडणवीस काय म्हणाले?
त्यांच्या दिल्ली दौऱ्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मी आज नागपूरमध्ये आहे. मी संध्याकाळी मुंबईला जाईन. मी मुंबईत आहे. मी महाराष्ट्रात आहे.” खरं तर, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर, फडणवीस केंद्र सरकारमध्ये जातील आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दुसऱ्या नेत्याकडे सोपवली जातील, अशा अफवांना जोर चढला होता. फडणवीस यांच्या थेट दिल्ली दौऱ्यामुळे या अटकळांना आणखी खतपाणी मिळाले. मात्र, त्यांच्या हलक्याफुलक्या उत्तराने सध्यातरी या अफवांना पूर्णविराम दिला आहे.
विविध विषयांवर माध्यमांशी संवाद…
(नागपूर | 26-7-2026)#Maharashtra #Nagpur pic.twitter.com/2GmFkZXro8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 26, 2026
हेही वाचा:“पोस्ट डिलीट करणार नाही” भाजप खासदाराच्या मुलीनेच केली होती प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
शिवसेना युबीटीचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जल्लोष साजरा केला. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “त्यात काहीही चुकीचे नाही. उद्धव ठाकरे यांना आनंद साजरा करण्याचे कारण सापडले याचा मला आनंद आहे. मलाही आनंद झाला आहे. अखेर, असे मुद्दे कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा पक्षाचे नसतात. हे तरुणांवर परिणाम करणारे मुद्दे आहेत.
फडणवीस पुढे म्हणाले, मोदींनी या प्रकरणात संवेदनशीलता दाखवली आहे. त्यांनी राष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊन परिस्थितीनुसार आवश्यक निर्णय घेतले. सोमवारी संसदेत एक विधेयक सादर केले जाईल, जे आपल्या तरुणांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी कठोर तरतुदी असलेला कायदा तयार करेल.”
“भाजप विरुद्ध भारत”
उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर ही लढाई भाजप विरुद्ध भारत अशी आहे असे सांगितले. ठाकरेंच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, “मला वाटते की त्यांनी गेल्या दशकात अनेकदा अशा गोष्टी सांगितल्या आहेत. तरीही, त्यांच्या शब्दांचा कोणावरही परिणाम होत नाही. संपूर्ण देश मोदींच्या पाठीशी उभा आहे.” पंतप्रधान मोदींनी रात्री १ वाजता पोस्ट केलेला आणि जागतिक इंस्टाग्राम विक्रम मोडणारा एक व्हिडिओ, भारत कोणाच्या पाठीशी उभा आहे हे स्पष्टपणे दाखवतो. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या शब्दांतून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
