जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी, पालक आणि इतर आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या वृत्तानंतर देशातील राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठ
.
रोहित पवारांचा हल्लाबोल; “इंग्रजांनाही लाजवणारं सरकार”
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर ब्रिटिश राजवटीत जसा लाठीचार्ज केला जात होता, तसाच प्रकार आता घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.
दिल्लीतील संसदेकडे निघालेला मोर्चा दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत त्यांनी, लोकशाहीत सर्वात मोठी ताकद ही रस्त्यावर उतरलेल्या सामान्य नागरिकाची असते, हे सरकारला लवकरच समजेल, असे म्हटले. सोनम वांगचुक यांनी २० दिवस उपोषण करूनही सरकारने त्यांच्या मागण्यांची दखल घेतली नाही, उलट त्यांच्यावर कारवाई केली, असा आरोपही त्यांनी केला.
याचबरोबर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अन्यथा हे आंदोलन सरकारच्या शेवटाची सुरुवात ठरेल, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या- “संवादाऐवजी बळाचा वापर अस्वीकार्य”
खासदार सुप्रिया सुळे यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या वृत्ताचा तीव्र निषेध केला. लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण मार्गाने आपली भूमिका मांडण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी दीर्घकाळ शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवले असून त्यांच्या मागण्यांवर सरकारने संवादातून तोडगा काढायला हवा होता, असे त्या म्हणाल्या. आंदोलनकर्त्यांचा आवाज दडपण्यासाठी बळाचा वापर करणे दुर्दैवी आणि अस्वीकार्य असल्याचेही त्यांनी म्हटले.
सुळे यांनी मेट्रो सेवा बंद ठेवल्यामुळे सामान्य प्रवाशांनाही मोठा त्रास सहन करावा लागल्याचा उल्लेख करत, सरकारने तातडीने आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
आदित्य ठाकरे म्हणाले- “विद्यार्थ्यांविरोधात बळाचा वापर करणारे सरकार भ्याड”
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे यांनीही सोशल मीडियावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. परीक्षा पेपरफुटीप्रकरणी न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या समर्थनार्थ उभ्या राहिलेल्या नागरिकांवर बळाचा वापर करणे हे भ्याड सरकारचे लक्षण असल्याची टीका त्यांनी केली.
संजय राऊत यांचीही टीका
खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर निशाणा साधत, “सरकार विद्यार्थ्यांना घाबरले आहे,” अशी टीका केली. संसदेवरील मोर्चाला परवानगी नाकारल्याबद्दल त्यांनी सरकारवर हल्लाबोल करत विविध केंद्रीय संस्थांवरही आरोप केले.
दिल्ली पोलिसांचे स्पष्टीकरण
दरम्यान, या सर्व घडामोडींवर दिल्ली पोलिसांनी अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. काही माध्यमांमध्ये जंतर-मंतर येथे पोलिसांकडून हिंसाचार किंवा आंदोलकांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असल्या, तरी अशा कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत, असे पोलिसांनी म्हटले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आंदोलन व्यावसायिक पद्धतीने हाताळले जात असून नागरिकांनी अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये. तसेच परिसरात शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही दिल्ली पोलिसांनी केले आहे.
जंतर-मंतर परिसरातील परिस्थिती आणि आंदोलनादरम्यान नेमके काय घडले याबाबत वेगवेगळे दावे समोर येत असून, या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत.
हेही वाचा…
जंतरमंतरवर तरुणांवर लाठीचार्ज, अनेकांची डोकी फुटली:बॅरिकेडिंग तोडून पार्लमेंट ठाण्यापर्यंत पोहोचले; दीपके म्हणाले- आम्हाला कुणीही रोखू शकत नाही

जंतर-मंतर येथे सोमवारी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) निदर्शकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक जण जखमी झाले असून काहींच्या डोक्याला दुखापत झाली आहे.
सुमारे ३०,००० ते ३५,००० निदर्शक जंतर-मंतरपासून संसदेच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांनी बॅरिकेड्स तोडून ‘पार्लमेंट स्ट्रीट’ पोलीस ठाण्यापर्यंत मजल मारली आहे; पोलिसांनी या मार्गावर बॅरिकेड्सचे अनेक स्तर उभारले आहेत.
दिल्ली पोलीस आणि आरएएफ (RAF) चे मोठ्या संख्येने जवान तैनात करण्यात आले आहेत. या मोर्चासाठी परवानगी देण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांनी ठामपणे सांगितले की, त्यांना कोणीही रोखू शकत नाही आणि संसदेकडे काढला जाणारा हा मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण असेल. येथे वाचा संपूर्ण बातमी
