शासनाकडून जमिनीचं अधिग्रहण झाल्यानंतरही गेल्या 31 वर्षांत एकही रुपया मिळाला नाही. मोबदल्याची वाट पाहत दोन भावांचा मृत्यू झाला. पण शासनाकडून मोबदला मिळाला नाही. या घटनेची कोर्टाने अखेर गंभीर दखल घेतली आहे. कोर्टाने थेट छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : “माझ्या १६ एकर जमिनीचा ३१ वर्षांपासून सरकारकडून एक रुपयाही मोबदला मिळालेला नाही. या मोबदल्याची आणि न्यायाची वाट पाहता पाहता माझ्या दोन भावांचा मृत्यू झाला. आता अजून किती वाट पाहायची?”, असा आर्त आणि संतप्त सवाल आहे, फुलंब्री तालुक्यातील लिहा येथील पीडित शेतकरी बजरंग हरिचंद ताटू यांचा. याच प्रकरणात प्रदीर्घ संघर्षानंतर न्यायालयाने थेट छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यातील शासकीय खुर्ची आणि चल मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिल्याने गुरुवारी (१६ जुलै २०२६) जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचंड खळबळ उडाली. जप्तीची कारवाई करण्यासाठी कोर्टाचे बेलिफ दारात पोहोचताच नामुष्की टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दालन तब्बल तीन तास कुलूपबंद ठेवण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी बजरंग ताटू यांची सुमारे १६ एकर जमीन १९९६ मध्ये जलसंपदा विभागाच्या एका स्थानिक प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आली होती. मात्र, जमिनीचा ताबा घेऊनही प्रशासनाने त्यांना मोबदला दिला नाही. हतबल झालेल्या ताटू यांनी अखेर १५ वर्षांपूर्वी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. दीर्घ कायदेशीर लढ्यानंतर न्यायालयाने ६ ऑगस्ट २०२२ रोजी शेतकऱ्याच्या बाजूने निकाल दिला. ताटू यांना त्वरित २ कोटी २२ लाख ६१ हजार १९ रुपयांचा थकीत मोबदला देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते.
खुर्ची जप्तीचे वॉरंट निघताच दालन बंद!
न्यायालयाने दिलेल्या मुदतीतही जलसंपदा विभाग आणि प्रशासनाने ही रक्कम अदा केली नाही. अखेर न्यायालयाचा अवमान झाल्याचे स्पष्ट झाल्यावर, कोर्टाने शासनाचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातील चल मालमत्तेवर (खुर्ची, टेबल आणि कार्यालयीन साहित्य) जप्तीचे वॉरंट बजावले. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी गुरुवारी दुपारी न्यायालयाचे बेलिफ जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.
या अचानक झालेल्या कारवाईने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी हादरले. जिल्हाधिकारी जेवणासाठी बाहेर गेले असल्याचे कारण सांगत त्यांचे दालन ताबडतोब कुलूपबंद करण्यात आले. या नाट्यमय घडामोडींदरम्यान, सामान्य प्रशासन विभागाच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी शेतकऱ्याच्या वकिलांकडे पैसे जमा करण्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्याची विनंती केली. मात्र, गेली तीन दशके न्यायासाठी हेलपाटे मारत असलेल्या शेतकऱ्याच्या वकिलांनी या मुदतीला साफ नकार दिला.
३ तास प्रतीक्षा आणि पंचनामा
न्यायालयाचे बेलिफ आणि शेतकऱ्याचे प्रतिनिधी तब्बल तीन तास बंद दालनाबाहेर उभे होते. अखेर दालन न उघडल्याने बेलिफने परिस्थितीचा अधिकृत पंचनामा केला. या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने जाणीवपूर्वक जप्ती टाळण्यासाठी दालन बंद ठेवल्याचा आरोप करत शेतकऱ्याचे वकील बारहाते यांनी जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.
“आमचा थेट संबंध नाही”, जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण
या संपूर्ण प्रकरणावर छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी प्रशासनाची बाजू मांडली आहे. “हा प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्याचा विषय असून जलसंपदा विभागाने हा मावेजा दिलेला नाही. न्यायालयाने आम्हाला केवळ शासनाचे प्रतिनिधी म्हणून नोटीस बजावली आहे. त्यामुळे या प्रकरणाशी जिल्हाधिकारी कार्यालयाचा थेट संबंध नाही,” असा दावा त्यांनी केला.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा