Headlines

Cockroach Cafe in Bihar Goes Viral Over Its Unusual Name | ‘तुकाराम मुंढे या हॉटेलवर कारवाई करू शकत नाही’, सुरू झालेय कॉकरोच कॅफे, व्हिडीओ झाला व्हायरल


Cockroach Cafe Instagram: बिहारमध्ये ‘कॉकरोच कॅफे’ सुरू झालाय. हटके नावामुळे हा कॅफे सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. नेटकरी त्यावर मजेशीर मीम्स आणि कमेंट्स करत आहेत. चला, पाहूया या व्हायरल कॅफेचा व्हिडीओ.

Cockroach Cafe Bihar
(फोटो सौजन्य – 01_nalanda_se/Instagram)
जगप्रसिद्ध लेखक विल्यम शेक्सपिअर यांच्या रोमिओ अँड ज्युलिएट या नाटकातील हे वाक्य तुम्ही देखील ऐकलं असेल. ‘नावात काय आहे?’ पण गंमत म्हणजे हल्ली नावातच सगळं काही आहे, असं म्हणायची वेळ आलीये. होय, अगदी बिझनेसमध्ये सुद्धा जर तुमच्या कंपनीचं नाव थोडं हटके असेल, तर ग्राहक आकर्षित होतो. अन् हाच विचार करून बिहारमधील एका उद्योजकानं सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला शब्द आपल्या कॅफेला दिलाय. कॉकरोच! बिहारमध्ये ‘कॉकरोच कॅफे’ नावाचं एक रेस्टॉरंट सुरू करण्यात आलं आहे. आणि या नावामुळेच हे कॅफे सध्या देशभरात चर्चेत आलंय.

कॉकरोच कॅफेची सोशल मीडियावर चर्चा

कॉकरोच कॅफेची सोशल मीडियावर चर्चा

कॉकरोच हे नाव का चर्चेत आलं, हे तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही. देशभरात सध्या शिक्षण व्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांची जी आंदोलनं सुरू आहेत, त्यासंबंधी प्रत्येक बातमीत तुम्हाला कॉकरोचचा उल्लेख पाहायला मिळेल. त्यामुळे हा शब्द सध्या झेन झी आणि जनरेशन अल्फा या नव्या पिढीतील तरुणांना आकर्षित करतोय. हा शब्द सध्या इन्स्टाग्रामपासून सोशल मीडियावरील विविध प्लॅटफॉर्मवर ट्रेंड होतोय. अन् त्यामुळे या कॉकरोच कॅफेची चर्चादेखील सोशल मीडियावर होताना दिसत आहे. तसंच, या कॉकरोच कॅफेचा व्हिडीओ देखील चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

कॅफेला कॉकरोच नाव का दिलं?

​ ​

या कॉकरोच कॅफेचा व्हिडीओ 01_nalanda_se या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हे कॅफे बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील हिलसा बायपास, पाटणा रोड येथे सुरू करण्यात आलं आहे. मालकानं NDTV ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तरुणांना काहीतरी वेगळं आवडतं. आणि ‘कॉकरोच कॅफे’ हे नाव खूपच वेगळं आहे. तुम्हाला ‘रॉयल कॅफे’ नावानं नाक्यानाक्यावर हॉटेल्स दिसतील. पण ‘कॉकरोच’ नावानं एकही नाही. त्यामुळे लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी आणि कॅफेचं नाव त्यांच्या स्मरणात राहावं, म्हणून त्यांनी हेच नाव दिलं.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा