मुंबई: तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते विजय यांनी १५ ऑगस्ट रोजी चेन्नईतील फोर्ट सेंट जॉर्ज इथं ध्वजारोहण करून स्वातंत्र्यदिन सोहळा साजरा केला. या सोहळ्यात लोकप्रिय अभिनेत्री त्रिशा कृष्णन हिच्या उपस्थितीनं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विजय यांच्या पत्नी संगीता यांनी न्यायालयातून घटस्फोटाची याचिका मागे घेतल्यानंतरचा हा पहिलाच मोठा सार्वजनिक कार्यक्रम होता, ज्यामुळं त्रिशाच्या या उपस्थितीची सध्या मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
व्हीआयपी पॅव्हेलियनमधील त्रिशाची उपस्थिती आणि विजय यांच्या कुटुंबाशी संवाद
तर स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. परेडदरम्यान मुख्यमंत्री विजय आपल्या जीपमधून पुढं जात असताना त्रिशानं त्यांना आदरपूर्वक सॅल्यूट ठोकल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या कार्यक्रमात त्रिशा ही विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर आणि आई शोभा चंद्रशेखर यांच्या शेजारीच पहिल्या रांगेत बसलेली पाहायला मिळाली. तिनं पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती आणि ती विजय यांच्या पालकांशी संवाद साधताना अतिशय आनंदात दिसत होती.
पत्नी संगीतानं मागे घेतली आहे घटस्फोटाची याचिका
काही दिवसांपूर्वीच विजय यांची पत्नी संगीता यांनी चेंगलपट्टू कौटुंबिक न्यायालयात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका मागे घेतल्याचं समोर आलं होतं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर राहून त्यांनी हा खटला पुढं चालवण्याची इच्छा नसल्याचे सांगितलं होतं, ज्यानंतर न्यायालयानं ही याचिका निकाली काढली. संगीता यांनी याचिकेत केलेल्या काही आरोपांनंतर त्रिशा आणि विजय यांच्या वैयक्तिक नातेसंबंधांबद्दल विविध चर्चांना उधाण आलं होतं.
यापूर्वीही विजय यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याला त्रिशानं हजेरी लावली होती. विजय आणि त्रिशा यांनी ‘गिळ्ळी’, ‘तिरुपाची’, ‘कुरुवी’ आणि ‘लिओ’ यांसारख्या अनेक यशस्वी तमिळ चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.
विजय आणि त्रिशा या दोघांनी नेहमीच एकमेकांना चांगले मित्र म्हटलं असले, तरी स्वातंत्र्यदिन सोहळ्यातील त्रिशाच्या सॅल्यूट आणि तिच्या उपस्थितीनं पुन्हा एकदा सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे.
त्रिशाची भूमिका आणि स्पष्टीकरण
राजकीय विरोधकांकडून जेव्हा त्रिशा नावाचा वापर राजकीय चिखलफेकीसाठी केला गेला, तेव्हा तिनं कायदेशीर नोटीस पाठवून स्पष्ट केलं की, तिचा कोणत्याही राजकीय पक्षाशी थेट संबंध नाही आणि तिची ओळख केवळ एक अभिनेत्री म्हणून राहावी.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा