Headlines

Chandrashekhar bawankule responds strongly to manoj jarange criticism says he became emotional; मराठ्यांच्या नादी लागल्याने रडकुंडीला आले, जरांगेंची टीका; बावनकुळे म्हणाले, आईचा उल्लेख झाल्याने भावनिक झालो


नागपूर : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे आणि भाजप नेते व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यातील शाब्दिक संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बावनकुळे हे मराठ्यांच्या नादी लागल्यामुळे रडकुंडीला आले आहेत, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. तसेच ‘परळीच्या टोळीच्या नादी लागल्यामुळे ही वेळ आली’, असे म्हणत जरांगे यांनी बावनकुळेंवर निशाणा साधला. मात्र, जरांगे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास बावनकुळेंनी स्पष्टपणे नकार दिला.

पुण्यात पत्रकारांनी आपल्या दिवंगत आईचा उल्लेख केल्याने आपण भावनिक झालो होतो, असे चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितले. माझ्या आईचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले आहे. तिचे नाव काढल्यामुळे मला तिची आठवण आली आणि मी भावनिक झालो. या प्रकरणात कोणाचे काय आहे, याबद्दल मला काही बोलायचे नाही, असं ते म्हणाले.

यावेळी बावनकुळेंनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी संबंधित टीकेवरही जोरदार निशाणा साधला. राहुल गांधी यांनी एका महिला राष्ट्राध्यक्षांचा अपमान केल्याचा आरोप करत त्यांनी या वक्तव्याचा निषेध केला. “भारताची भूमिका ‘वसुधैव कुटुंबकम्’ची आहे. संपूर्ण विश्वाला आपले मानणारी भारताची संस्कृती आहे. महिला राष्ट्राध्यक्षांबाबत अशा प्रकारची टीका करणे आणि भारताच्या संस्कृतीला बदनाम करणे योग्य नाही, राहुल गांधी यांनी भारताचे संस्कार आणि संस्कृती विसरू नये, राजकारणासाठी कोणत्याही स्तराला जाणे योग्य नाही. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल देशाची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी,” अशी मागणीही बावनकुळेंनी केली.

दरम्यान, इस्रोच्या भेटीसाठी गेलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या नागपुरात झालेल्या स्वागतावेळी बावनकुळेंनी राज्य सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक होण्याची प्रेरणा निर्माण व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणराज्य मंत्री पंकज भोयर यांनी विद्यार्थ्यांना इस्रोला पाठविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मनात ऊर्जा निर्माण झाली असून, “आपणही वैज्ञानिक होऊ शकतो,” अशी भावना त्यांच्यात निर्माण झाल्याचे बावनकुळे म्हणाले.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत