Cabinet Meetings: मंत्रिमंडळ समिती कक्षाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या महत्त्वाच्या बैठका या ठिकाणी होणार आहेत.

राज्य सरकारने जवळपास १६०० कोटी रुपये खर्चून केंद्राकडून एअर इंडिया इमारत घेतली आहे. या ठिकाणी कार्यालय मिळावे यासाठी मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी वाट बघत आहेत. अथांग समुद्राची साथ लाभलेल्या या इमारतीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी आणि इतर महत्त्वाच्या बैठकांसाठी मंत्रिमंडळ समिती कक्ष उभारण्यात येणार आहे. इमारतीच्या २२व्या मजल्यावर या कक्षाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने या इमारतीचे पाहणी पूर्ण केली असून लवकरच याठिकाणी राज्य सरकारच्या काही विभागांची कार्यालये स्थलांतरित करण्यात येणार आहे.
Local Body Election: राज्यात पुन्हा निवडणुकीचं बिगुल वाजणार! प्रलंबित जिल्हा परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायतींसाठी होणार मतदान
याशिवाय या इमारतीच्या २२व्या मजल्यावर मंत्रिमंडळाच्या नियमित बैठका, विविध मंत्रिमंडळ उपसमित्यांच्या बैठकांसह महत्त्वाच्या उच्चस्तरीय शासकीय बैठका याच कक्षात घेण्याचे नियोजन आहे. त्यानुसार २२व्या मजल्यावरील जागेचे अंतर्गत बांधकाम, ध्वनी व्यवस्था, अत्याधुनिक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुविधा, डिजिटल सादरीकरणासाठी आवश्यक यंत्रणा आणि सुरक्षा व्यवस्थेची उभारणी सुरू झाली आहे. बैठकीदरम्यान गोपनीयता आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
प्रशासकीय कामकाज गतिमान होणार
एअर इंडिया इमारत राज्य सरकारच्या ताब्यात आल्यानंतर मंत्रालयावरील जागेचा ताण कमी करण्यासाठी विविध विभागांची कार्यालये टप्प्याटप्प्याने येथे स्थलांतरित करण्याचाही आराखडा तयार करण्यात येत आहे. त्यामुळे मंत्रालयातील जागेची कमतरता दूर होण्याबरोबरच प्रशासकीय कामकाज अधिक सुसूत्र आणि गतिमान होईल, अशी अपेक्षा आहे. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या इमारतीत कार्यालय मिळण्याबाबत उत्सुकता दर्शविली आहे.
Aditya Thackeray: गाडी-बंगल्याची मागणी, आदित्य ठाकरेंनी भाजप-शिंदेंना कोंडीत पकडलं; मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी
या विभागांना कार्यालये
मुख्यमंत्री कार्यालयासह आरोग्य भवन, ग्रामविकास विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, – परिवहन आयुक्तालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मत्स्यव्यवसाय आयुक्तालय यासारख्या अनेक विभागांना याठिकाणी कार्यालये देण्यात येणार आहेत. यासंदर्भात अंतिम निर्णय लवकरच घेतला जाणार असल्याचे समजते.

