Headlines

Burger King Employee Argues With Customer Over Water Video Goes Viral | ‘तुझ्या बापाचं हॉटल आहे का?’, पाण्यासाठी कर्मचारी आणि ग्राहकामध्ये झाला वाद, उद्धट उत्तरामुळे लोकही चिढले


Burger King customer fight: बर्गर किंगमध्ये पिण्याच्या पाण्यावरून ग्राहक आणि कर्मचाऱ्यामध्ये वाद झाला. ग्राहकाने पाणी मागितले, पण कर्मचाऱ्याने पाणी देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान हा व्हिडीओ व्हायरल होत असून संतापलेले नेटकरी कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी करत आहेत.

Burger King employee controversy
(फोटो सौजन्य – @WarlockHindu/x.com)
काही लोकांमध्ये भयंकर अहंकार असतो. अगदी साध्या-साध्या गोष्टींवरही राग व्यक्त करत उलटसुलट उत्तरं देतात. परिणामी, कारण नसताना प्रकरण भांडणापर्यंत पोहोचतं. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने पाण्यावरून ग्राहकासोबत वाद घातला. घडलं असं की ग्राहकाने पाणी मागितलं. पण कर्मचाऱ्याने शांतपणे उत्तर देण्याऐवजी आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केलं. परिणामी, ग्राहकही चिडला आणि “तुझ्या वडिलांचं दुकान आहे का?” असा प्रश्न विचारला. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून अनेकांनी कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा निषेध केला आहे. लोकांनी बर्गर किंग इंडियाला टॅग करून कर्मचारी प्रशिक्षण सुधारण्याची मागणी केली आहे.

भांडण का वाढलं?

हा व्हिडीओ @WarlockHindu या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ २ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. ग्राहकाने पिण्याचं पाणी मागितलं होतं. पण दुकानातील कर्मचाऱ्याने पाणी देण्यास नकार दिला. त्यानंतर ग्राहक आणि कर्मचाऱ्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, ग्राहकाने “तुझा व्हिडीओ काढून मी तक्रार करणार” अशी धमकी दिली. पण कर्मचाऱ्यानेही “बिनधास्त व्हिडीओ काढ आणि कोणालाही पाठव” असं प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे हा वाद आणखी वाढला.

व्हिडीओ पाहून नेटकरी भडकले

हा व्हिडीओ पाहून नेटकरी प्रचंड चिडले आहेत. कर्मचाऱ्यावर टीका करत त्याच्यावर कारवाई करा, अशी मागणी ते बर्गर किंगकडे करत आहेत. वास्तविक, पाणी मिळू शकत नाही हे त्याने अगदी शांतपणे सांगितलं असतं किंवा काही सेकंद खर्च करून त्या ग्राहकाला पाणी दिलं असतं, तर कदाचित हा वाद टाळता आला असता. असो, या प्रकरणी तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा