Bacchu Kadu: कंपन्यांना सरळ करा, अन्यथा कार्यालये पेटवू! असा बोगस बियाण्यांवरुन बच्चू कडूंनी सरकारला इशारा दिला आहे.

अमरावती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या तपासणीत बूस्टर कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांमध्ये कमालीचा घोळ आणि अनियमितता समोर आली आहे. यानंतर कृषी विभागाने फौजदारी कारवाई केली असली, तरी केवळ तेवढ्याने भागणार नाही, असा आक्षेप कडू यांनी नोंदवला.
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका, पुण्याच्या मार्केट यार्डमधील दुकान सील
सध्याचे बियाणे कायदे केवळ नावापुरते उरले असून त्यात आमूलाग्र बदलांची गरज आहे, असे स्पष्ट करत कडू यांनी नव्या कायद्याचा मसुदा मांडला. निकृष्ट बियाणे आढळल्यास शेतकऱ्यांना तत्काळ मोफत दर्जेदार बियाणे मिळायला हवे. तसेच पिकांचे नुकसान झाल्यास संबंधित कंपनीकडून प्रति एकर किमान दोन लाख रुपये नुकसानभरपाई वसूल करण्याची तरतूद नव्या कायद्यात असावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.
यशोदा सीड्सविरुद्ध गुन्हे
बुलढाणा : सोयाबीन बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर तपासात अप्रमाणित नमुने आढळून आल्याने यशोदा हायब्रीड सीड्स कंपनीविरुद्ध खामगाव शहर पोलिसांत विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील ही कंपनी आहे. खामगाव तालुक्यातील अकोली येथील शेतकरी सुभाष किसन मुजुमले यांनी यशोदा हायब्रीड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सोयाबीन बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत तक्रार केली होती.
Heramb Karmarkar : होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात पुणेकर तरुणाने प्राण गमावले, मरीन इंजिनिअर हेरंब करमरकर यांचा करुण अंत
फत्तापूरच्या अवैध उत्खननावर कारवाई होणार- चंद्रशेखर बावनकुळे
वरोरा तालुक्यातील फत्तापूर येथील सर्व्हे नं. १८० व लगतच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अवैध खनिज उत्खनन करून शासनाच्या महसुलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अवैध उत्खननाची गंभीर दखल घेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, यात दोषी आढळल्यास खाणकाम व्यावसायिकासह तलाठी, तहसीलदार ते प्रांताधिकारी अशा सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर सामूहिक जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

