Headlines

admin

आषाढात भजी अन् पुऱ्या का तळतात? पूर्वजांच्या प्रथेमागचे वैज्ञानिक कारण वाचून थक्क व्हाल। Maharashtra Times

पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यप्रकाश कमी मिळतो, ज्यामुळे शरीरात ‘सेरोटोनिन’ (हॅपी हार्मोन) कमी होऊन सुस्ती येते. अशा वेळी शरीराला झटपट ऊर्जेची गरज असते. तळलेले पदार्थ शरीराचे अंतर्गत तापमान उबदार ठेवतात आणि कार्बोहायड्रेट्समुळे त्वरित एनर्जी देतात. म्हणजेच, ‘आषाढ तळणे’ ही शरीराची मान्सूनमधील जैविक गरज पूर्ण करणारी शास्त्रीय पद्धत आहे. चला तर मग या ‘आषाढ तळणे’ मागचे वैज्ञानिक…

Read More

18 धावांत 5 विकेट्स, पाकिस्तानचा कर्दनकाळ ठरला; कोण आहे वेस्ट इंडिजचा स्टार जेडन सील्स?

Who is jayden seales : पाकिस्तानविरुद्ध 18 धावांत 5 विकेट्स घेत वेस्ट इंडिजला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा जेडन सील्स सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. अवघ्या 24 व्या वर्षी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 100 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. कोण आहे हा वेगवान गोलंदाज? जाणून घ्या त्याचा प्रवास. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान…

Read More

इराणविरोधी युद्धात सौदी अरेबियाची एन्ट्री

अमेरिकेसोबत सामील होऊन इराकमधील इराण-समर्थक योद्ध्यांवर हल्ला : 20 जण ठार वृत्तसंस्था बगदाद, तेहरान अमेरिका-इराण यांच्यातील युद्धात आता सौदी अरेबियाही उतरला आहे. सौदी अरेबियाने अमेरिकेसोबत मिळून मंगळवारी रात्री इराकमधील इराण-समर्थक ‘पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्सेस’च्या (पीएमएफ) योद्ध्यांच्या तळांवर हल्ला केला. या भीषण हल्ल्यात 20 जण ठार झाल्याचा दावा केला जात असून तब्बल 32 जण जखमी झाले आहेत….

Read More

कोयना धरणाच्या जलाशयाचे नामांतर:आता "छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर' नावाने ओळखले जाणार, राज्य सरकारचा निर्णय

पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कोयना जलसागराला आता ‘छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर’ या नावाने ओळखले जाणार आहे. राज्य सरकारने कोयना जलसागराच्या नामांतराचा ऐतिहासिक निर्णय घेतला असून, यासंदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. कोयना जलसागराचे नामांतर करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार…

Read More

दर्यापूरच्या प्राध्यापकाने गोवऱ्या बनवण्याचे यंत्र बनवले:या अभिनव संशोधनाला भारत सरकारकडून मिळाले पेटंट

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील माहुली (धांडे) येथील गाडगेबाबा गोरक्षण संस्थेचे संस्थापक प्राध्यापक गजानन भारसाकळे यांनी गोवऱ्या बनवण्याचे अभिनव यंत्र तयार केले आहे. त्यांच्या या संशोधनाला भारत सरकारकडून पेटंटही मिळाले आहे. या यशामुळे ग्रामीण भागातील एका महत्त्वाच्या कामाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. या संशोधनाचे नाव “गाईच्या शेणापासून गोवरी उत्पादनास्तव आयओटी बेस मशीन निर्मिती” असे आहे….

Read More

525 NHM कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी:यादी जाहीर; हरकती नोंदवण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत, 7 ऑगस्ट रोजी अंतिम यादी

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील ५२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या या कर्मचाऱ्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीतील संभाव्य तांत्रिक चुकांवर हरकती नोंदवण्यासाठी संबंधित उमेदवारांना ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्राप्त हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी…

Read More

राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा:हजारो भाविकांची उपस्थिती, स्मृतींना उजाळा

मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीस्थळी गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात पार पडला. या महोत्सवाला हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तीर्थस्थापना आणि सामुदायिक ध्यानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रसंतांची महासमाधी रंगीबेरंगी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघाली होती. पहाटे चार वाजता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचा अभिषेक करण्यात आला. गुरुदेवप्रेमींनी गुरुमाऊलीला आदरांजली वाहताना विविध भजने गायली. शंखनाद आणि…

Read More

अमरावती सुपर स्पेशालिटीत दुर्मिळ अन्ननलिका कर्करोगावर यशस्वी शस्त्रक्रिया:डॉ. अतुल यादगिरे यांच्या नेतृत्वाखाली 40 वर्षीय महिलेवर उपचार

अमरावती येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) येथे अन्ननलिकेच्या दुर्मिळ कर्करोगाने ग्रस्त असलेल्या ४० वर्षीय महिलेवर यशस्वी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील रहिवासी असलेल्या या महिलेला कर्करोग तज्ज्ञ डॉ. अतुल यादगिरे आणि त्यांच्या चमूने जीवनदान दिले. रुग्णाला अन्न गिळताना आणि पाणी पितानाही तीव्र त्रास होत होता. अन्ननलिकेत अडथळा निर्माण झाल्याने तिच्या…

Read More

रोजगार निर्माण करणारे उद्योजक बना:डॉ. चंद्रकांत शिंदे यांचे श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

अमरावती येथील श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित करिअर संसद शपथविधी सोहळ्यात श्री संकल्प मीडिया सोल्युशनचे संचालक डॉ. चंद्रकांत शिंदे यांनी विद्यार्थ्यांना रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याचे आवाहन केले. त्यांनी पदवी घेऊन न थांबता स्वतःच्या कल्पना, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर उद्योजक बनण्याचा प्रेरणादायी संदेश दिला. महाविद्यालयाच्या सर सी.व्ही. रमण सभागृहात ‘करिअर संसद शपथविधी आणि यशस्वी उद्योजकांशी…

Read More

लहान व्यावसायिकांवर कारवाई, पण हेल्मेट विक्रेत्यांवर का नाही?:भीम ब्रिगेडचा महानगरपालिकेला सवाल, आयुक्तांना निवेदन

अमरावती शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यावरून भीम ब्रिगेडने महापालिका प्रशासनावर दुटप्पी धोरणाचा आरोप केला आहे. चहा, पानटपरी आणि नाश्त्याची गाडी लावणाऱ्या लहान व्यावसायिकांवर कारवाई केली जाते, मात्र रस्त्यांच्या कडेला दुकाने थाटणाऱ्या हेल्मेट विक्रेत्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा सवाल संघटनेने उपस्थित केला आहे. या संदर्भात भीम ब्रिगेडने बुधवारी (२९ जुलै) मनपाचे अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांना…

Read More