पुणे: राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढलं असून पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेलं असताना आषाढी वारीलाही पावसाचा फटका बसत असल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला येणाऱ्या नागरिकांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं आहे. “इंद्रायणी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नाही. ज्या वारकरी व भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी ज्या ठिकाणी आहात तिथेच सुरक्षित थांबावे आणि आळंदीमध्ये येण्याचा प्रयत्न करू नये,” असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
वारकरी, भाविक व नागरिकांना आवाहन करताना प्रशासनाने म्हटलं आहे की, “कृपया पोलीस यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सूचनांचं सर्वांनी काटेकोरपणे पालन करावं. अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणं टाळावं. आपल्या सुरक्षिततेसाठी प्रशासन आवश्यक ती सर्व उपाययोजना करत आहे. सर्वांनी संयम बाळगून सहकार्य करावं, ही नम्र विनंती.”
पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी आज आणि उद्या रेड अलर्ट जारी केला आहे. शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं आहे. “सिंहगड घाट परिसर हे दरडप्रवण क्षेत्र असल्यामुळे मुसळधार पावसाने दरड कोसळणे, झाडे उन्मळून पडणे, दगड घसरणे, रस्त्यावर पाणी साचणे व इतर नैसर्गिक आपत्ती उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन सिंहगड घाट परिसरातील पर्यटकांचा प्रवेश आज आणि उद्या तात्पुरता बंद ठेवण्यात येत आहे,” अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे
आषाढी वारीसाठी जय्यत तयारी
आषाढी वारीच्या अनुषंगाने यात्रा कालावधीत १२ ते १५ लाख भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे येतात. यातील लाखो भाविक भीमा नदीच्या तीरावर स्नान व दर्शनासाठी येत असतात. मात्र, नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना वाळवंटात कचरा व कचरायुक्त वस्तू मोठ्या प्रमाणात पडलेल्या असतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भीमा नदीच्या वाळवंटात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वतः वाळवंटातील कचरा उचलून या मोहिमेची सुरुवात केली. आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा २५ जुलै रोजी असून, यात्रा कालावधी १५ ते २९ जुलै असा आहे. या यात्रेत येणाऱ्या दिंड्यांना वास्तव्यासाठी भक्तिसागर (६५ एकर) येथे जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ठिकाणी मोफत प्लॉट भाविकांना तंबू, राहुट्या उभारून वास्तव्य करण्यासाठी देण्यात येत आहेत. आज, सोमवारपासून प्लॉट नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. संबंधितांनी प्लॉटची मागणी नोंदवावी, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे. या ठिकाणी एकूण ६६८ प्लॉट भाविकांना निवाऱ्यासाठी दिले जातात.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा