Headlines

Anupama Parameswaran : कधी चांगला वागायचा तर कधी हैवान, बॉयफ्रेंडकडून शारीरिक, मानसिक छळ; लोकप्रिय अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा


Anupama Parameswaran On Her Relationship : दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरननं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या रिलेशनशिपबद्दल आणि ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे.

Anupama Parameswaran Faced Narcissistic Abuse In Relationship
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘प्रेमम’, ‘कार्तिकेय २’ आणि ‘टिल्लू स्क्वेअर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकलेली दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरननं तिच्या रिलेशनशिपबद्दल एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. अभिनेत्रीनं सांगितलं की, तिला जवळपास दोन वर्षे तिच्या बॉयफ्रेंडकडून होणारा छळ सहन करावा लागला. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कथित बॉयफ्रेंड अभिनेता ध्रुव विक्रमबरोबरच्या ब्रेकअपबाबत पोस्ट केल्यानंतर अनुपमानं एक्स बॉयफ्रेंडबाबत खुलासे केले आहेत.

रिलेशनशिपमध्ये अभिनेत्रीचा छळ झाला

धन्या वर्माला दिलेल्या मुलाखतीत अनुपमानं सांगितलं की, तिच्या रिलेशनशिपचा तिच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला होता. स्वतःच्या एका पोस्टचा संदर्भ देत अभिनेत्री म्हणाली की, ‘त्या एका पोस्टमागे दोन वर्षांच्या वेदना, शारीरिक आणि भावनिक खच्चीकरण दडलेलं होतं.’ अभिनेत्रीनं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलेलं की, ‘तुम्हाला आयुष्यात शांतता मिळवायची असेल तर शेवटी सगळं सोडून द्यावं लागतं.’

Maharashtra TimesSunil Lahri : ‘Gen Z, Gen Alpha ही आपली संस्कृती नाही, पुढच्या पिढीसाठी आपण कोणते शब्द वापरत आहोत?’ ‘रामायण’ फेम सुनील लहरींचं वक्तव्य
अनुपामा म्हणाली की, ‘मी सोशल मीडियावर जी पोस्ट केली, ती काही उगाचच मला वाटतं म्हणून अचानकपणे केलेली नाही. मी विचारपूर्वक आणि वेळ घेऊन केलेली ती पोस्ट होती. त्या पोस्टमागे दोन वर्षांच्या वेदना, शारीरिक आणि भावनिक त्रास यांचा अनुभव होता. मी पूर्णपणे यातून सावरल्यानंतर मी ती पोस्ट केली होती. त्या नात्यामुळे मला खूप त्रास झाला आणि त्याचा माझ्या शरीरावर परिणाम झाला. या काळामध्ये मी स्वतःला हरवून बसले होते आणि त्यामुळे माझं वजन खूप कमी झालं होतं. आयुष्यामध्ये प्रगती होत असली तरी मला आनंद होत नव्हता. उलट, मला अजून खचल्यासारखं वाटायचं.

Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड

अनुपमानं केला ‘नार्सिसिस्टिक ॲब्यूज’चा सामना

अनुपमा पुढे म्हणाली की, ‘मी दोन वर्षे ‘नार्सिसिस्टिक ॲब्यूज’चा (Narcissistic Abuse) सामना केलाय. दररोज समोरच्या व्यक्तीची कोणती बाजू पाहायला मिळेल, याची भीती वाटत होती. हे शंकरच्या ‘अन्नियन’ चित्रपटातील हीरोप्रमाणे वागणं आहे. एकाच व्यक्तीची दोन वेगवेगळी रूपं असतात. एखाद्या दिवशी तो आपल्यावर खूप जास्त प्रेम करतो किंवा खूप काळजी असल्याचं दाखवून देईल. जगातील सर्वांत भाग्यवान व्यक्ती असल्यासारखी वागणूक देईल. पण, दुसऱ्याच दिवशी त्याची सर्वात क्रूर बाजू समोर येईल. आजूबाजूला काय घडत आहे याची त्याला अजिबात पर्वा नसेल. त्यानंतर पुढच्या दिवशी तो सर्व चुका मान्य करून लहान मुलासारखा रडेल. सर्व चुकांसाठी माफी मागेल आणि पुन्हा असं करणार नाही, असा शब्द देईल आणि त्यानंतर पुन्हा हेच चक्र सुरू राहील’

Maharashtra TimesPooja Bedi : लग्नाच्या 9 वर्षात घटस्फोट, 8 वर्षांपूर्वी साखरपुडा; सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली, ‘आता माझ्यासाठी लग्न गरजेचं नाही’
‘मी पहिल्यांदाच इन्स्टाग्रामवरील एका रीलमध्ये मेडोना सेबॅस्टियनला या प्रकारच्या शोषणाबद्दल बोलताना पाहिलं होतं. ते बघून माझे माय थरथर कापत होते. अजूनही असे खूप जण आहेत, ज्यांना नार्सिसिस्टिक ॲब्यूजबद्दलची माहिती नाही.’ असंही अनुपमानं शेवटी सांगितलं.

Maharashtra TimesPriya Rajvansh : दिग्दर्शकावर प्रेम करणं पडलं महागात, संपत्तीमुळे अभिनेत्री मृत्यूच्या दाढेत, बॉयफ्रेंडच्याच बंगल्यात सापडली बॉडी; काय घडलेलं?
दरम्यान, अनुपमा परमेश्वरननं २०१५ मध्ये ‘प्रेमम’ या मल्याळम चित्रपटातून मेरी जॉर्जची भूमिका साकारून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिनं मल्याळम, तेलुगू, तमिळ आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘ए आ’, ‘कोडी’, ‘सथामनम भवती’, ‘कार्तिकेय 2’, आणि ‘थिल्लू स्क्वेअर’ यांसारख्या सिनेमांमध्ये अनुपमानं काम केलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा