Annu Kapoor : अन्नू कपूर यांनी ‘रामायण’ या सिनेमावर टीका केली असून सिनेमाच्या दिग्दर्शकांनाही टोमणा मारला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अभिनेता अन्नू कपूर यांनी पुन्हा एकदा नितेश तिवारी यांच्यावर निशाणा साधला असून ‘रामायण’ सिनेमामध्ये सीतेच्या भूमिकेसाठी साई पल्लवीच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ‘रामायण’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. रणबीर कपूर प्रभू रामाची भूमिका साकारत असून, साई पल्लवी देवी सीतेची भूमिका साकारत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर रामाच्या भूमिकेतील रणबीर कपूर आणि सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवी यांचं कौतुक होत असताना, अन्नू कपूर यांनी सीतेच्या भूमिकेतील साई पल्लवी आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
अन्नू कपूर यांची ‘रामायण’ सिनेमावर टीका
झूमला दिलेल्या एका मुलाखतीत अन्नू कपूर म्हणाले की, ‘ते फक्त रामानंद सागर यांच्या ‘रामायणा’मध्ये तांत्रिक सुधारणा करतील आणि कदाचित त्याची वेळ वाढवतील. पण, तुम्ही सीतेच्या भूमिकेसाठी कोणाला निवडलं आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे. माता सीतेची पूजा एक माता म्हणून केली जाते. या देशात लोक भगवान रामाची पूजा भगवान नारायणाचा अवतार म्हणून करतात. कलाकारांच्या निवडीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊ द्या.’ Salman Khan : थकलेले डोळे अन् बारीक शरीरयष्टी; सलमान खानला झालं तरी काय? चाहते चिंतेत, Video व्हायरल अन्नू कपूर यांनी नितेश तिवारी यांच्या ‘रामायणा’वर अनेकदा टीका केली आहे. २०२३ मध्ये नितेश तिवारी यांनी या चित्रपटाची घोषणा केल्यापासून अन्नू कपूर त्यावर टीका करत आहेत. आज तकला दिलेल्या एका मुलाखतीत अन्नू कपूर म्हणाले होते की, ‘नितेश तिवारी कोण आहे? त्याचा दर्जा काय आहे? हिंदू धर्माचा अपमान? चित्रपट बनवतोय? त्याला मारहाण होईल. आधी धर्म समजून घ्या आणि मग सिनेमा बनवा.’
नखरेल मराठी तारकांचा माज असा उतरवतो, Mahesh Tilekar यांची सनसनाटी मुलाखत
दरम्यान, ‘रामायण’बद्दल बोलायचं झाल्यास सिनेमाचा पहिला भाग या दिवाळीत प्रदर्शित होईल, तर दुसरा भाग २०२७ मध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटात रणबीर कपूर आणि साई पल्लवी यांच्यासोबत विविध कलाकार आहेत. अभिनेता यशने रावणाची भूमिका साकारली आहे, तर सनी देओलनं हनुमान, रवी दुबेनं लक्ष्मण आणि लारा दत्तानं कैकेयीची भूमिका साकारली आहे. अरुण गोविल यांनी राजा दशरथाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात इंदिरा कृष्णन, कुणाल कपूर, रकुल प्रीत सिंग, काजल अग्रवाल आणि विवेक ओबेरॉय हे कलाकारही आहेत.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा