Headlines

अरे नावातच ताकद ! रोहित-विराट फेल पण कॅप्टन गिलचा डोळे झाकून विश्वास, मॅच संपल्यावर काय म्हणाला?


IND vs ENG 1st ODI : इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानात दिसले. वर्ल्डकप नंतर पहिल्यांदाच रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसपित बुमराह तिघे एकत्र खेळत आहेत. भारताने हा सामना सहज जिंकला पण ‘रोको’ अपयशी ठरले, परंतु कॅप्टन शुभमन गिल याला आपल्या वरिष्ठ खेळाडूंवर डोळे झाकून विश्वास आहे. सामना संपल्यावर नेमकं काय म्हणाला जाणून घ्या.

Shubman Gill Rohit Sharma Virat Kohli
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : विराट कोहली आणि रोहित शर्मा अपयशी ठरल्यावर शुभमन गिलने भारतीय क्रिकेट संघास विजयी मार्गावर नेण्यास सुरुवात केली. तो शतकाकडे आत्मविश्वासाने वाटचाल करीत असतानाच त्याला निवृत्त व्हावे लागले. त्याआधी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला २५८ धावांत रोखले होते. त्यानंतर विराट आणि रोहित अपयशी ठरल्यावर कोणताही दबाव न घेता भारतीय फलंदाजांनी सामना जिंकवला. भारताच्या विजयानंतर शुभमन गिलने सांगितलं की त्याला फलंदाजीवर विश्वास होता म्हणूनच त्याने पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

शुभमन गिल काय म्हणाला?

मधल्या आणि खालच्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या कामगिरीमुळे संघाला खूप आत्मविश्वास मिळाला आहे. आमचे युवा गोलंदाज असल्याने आणि फलंदाजी अधिक अनुभवी आहे म्हणून मालिकेच्या पहिल्या सामन्यात आम्ही आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, कारण ३२० धावांचे लक्ष्य असले तरी आमच्या फलंदाजीवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सुरुवातीच्या ६ ते ७ ओव्हरमध्ये चेंडू स्विंग होत असताना आम्ही योग्य ठिकाणी गोलंदाजी केली आणि नंतर दबावात आल्यानंतरही ५ विकेट घेऊन चांगले पुनरागमन केले. २०२७च्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आम्ही वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करत आहोत. आजची पिच आणि परिस्थिती दक्षिण आफ्रिकेसारखी होती जिथे नवीन चेंडूने फलंदाजी सोपी नव्हती, असं शुभमन गिल म्हणाला.
Maharashtra TimesIND vs ENG : ना अक्षर पटेल, ना शुभमन; इंग्लंडच्या पराभवासाठी भारताचे तीन खेळाडू जबाबदार, इंग्लंडचा कॅप्टन हॅरी ब्रुक काय म्हणाला?
शुभमन गिलने इंग्लंडच्या गोलंदाजीवर सुरुवातीपासून वर्चस्व राखताना आक्रमक सुरुवात केली. मात्र त्याचा अनुभवी सहकारी रोहित शमां धावांसाठी संघर्ष करीत होता. गिल आणि रोहितने ४५ चेंडूंत ४३ धावा जोडल्या, त्यात रोहितचा वाटा २१ चेंडूंतल ११ धावांचा होता. त्यावरून त्याचा संघर्ष लक्षात येईल. टी-२० मालिकेत वैभव सूर्यवंशीला टिकू न दिलेल्या जोफ्रा आर्चरने विराट कोहलीला चकवले.
Maharashtra TimesIND vs ENG 1st ODI : आता कसं वाटतंय! भारताने इंग्लंडला पहिल्याच वनडेत लोळवलं, 6 विकेटने विजय मिळवत मालिकेत 1-0ने आघाडी, विजयाचे शिल्पकार कोण?
भारताची अवस्था ८.३ षटकांत २ बाद ४८ अशी झाली. गिलने श्रेयस अय्यरसह १०३ चेंडूंत १०१ धावा जोडत भारताच्या आशा उंचावल्या. हे दोघे इंग्लंडच्या गोलंदाजीवर वर्चस्व राखत असतानाच गिल पायात गोळे आल्यामुळे निवृत्त झाला. त्याने ७५ चेंडूंत ११ चौकार व एका षटकारासह ८० धावा केल्या. २ बाद १४९वरून भारताचा डाव अचानक ४ बाद १६० असा घसरला. मात्र वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलने नाबाद अर्धशतकी भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला.
Maharashtra TimesIND vs ENG 1st ODI : भारत इंग्लंड मालिकेदरम्यान मोठी अपडेट, कोच गौतम गंभीरचा विश्वासूच सोडणार त्याची साथ, पडद्यामागे नेमकं काय चाललंय?
दरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या उपस्थितीने संघाला बळकटी आल्यासारखं झालं आहे. दोघांवर तितकाच विश्वास शुभमन गिलचा आहे. त्यामुळेच त्याने बिंधास्तपणे पहिल्यांदा गोलंदाजी केली. जरी दोघे अपयशी ठरले तेव्हा स्वत:च्या खांद्यावर जबाबदारी घेत भारताला दबावातून बाहेर काढले. स्नायू दुखावले गेल्याने त्याला ८० धावांवर माघारी जावं लागलं पण त्याची ही खेळी शतकापेक्षा मोठी होती.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा