Headlines

Pandurang Bhuwad Death in Tree Collapsed Incident Near RTO Office in Thane


ठाण्यात मुसळधार पावासात झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत पांडुरंग भुवड हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. पण रुग्णालयातील त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. पांडुरंग भुवड यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Thane News
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : ठाण्यातील लुईसवाडी सेवा रस्त्यानजीकच्या ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर झाड अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग भुवड यांचा गुरुवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या तीन दिवसांपासून भुवड यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.

मुंबईपाठोपाठ ठाण्यातही वृक्ष पडझडीत सर्वसामान्य नागरिकाचा मृत्यू झाल्याने या प्रकरणी दोषींवर नेमकी काय कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभ राव यांच्याशी फोनवरुन संपर्क साधत भुवड कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.

नेमकी घटना कशी घडली?

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयानजीक धर्मवीर नगर येथे राहणारे पांडुरंग भुवड हे सोमवारी ६ जून रोजी नळ दुरुस्तीच्या कामासाठी चालत जात होते. यावेळी जोरदार पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरु झाल्याने आरटीओ कार्यालयासमोर एका झाडाच्या आडोशाला भुवड उभे असतानाच त्यांच्यावर झाड कोसळले.

त्यांना तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गुंतागुंतीची शस्त्रक्रिया त्यांच्यावर करण्यात होती. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेल्याने गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.

कुटुंबाचा आधार हरपला

भुवड यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुली आहेत. भुवड यांना प्लम्बिंगच्या कामातून मिळणाऱ्या तुटपुंज्या उत्पन्नावर कुटुंबाचा गाडा हाकला जात होता. आता वडिलांच्या अकस्मात मृत्यूने भुवड कुटुंबाचा आधार हरपला असून त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, घटनेच्या अनुषंगाने महापौर शर्मिला पिंपळोलकर यांनी पालिकेच्या प्रभाग समिती सहायक आयुक्तांची बैठक घेतली. या बैठकीत धोकादायक आणि जीर्ण वृक्षांचे सर्वेक्षण करुन आवश्यक छाटणी आणि निष्कासनाची कारवाई करण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिल्या.

कुटुंबाला आर्थिक मदत

वृक्ष पडझडीत जखमी भुवड यांना शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे आणि नम्रता भोसले – जाधव यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर रेपाळे आणि जाधव यांनी तात्काळ ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त राव यांच्याशी फोनवरुन संपर्क साधत भुवड कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले.

महासभेत याप्रश्नी ठराव मंजूर करुन भुवड कुटुंबाला आर्थिक मदत आणि त्यांच्या वारसाला ठाणे पालिकेत नोकरी देण्यात येईल, याप्रश्नी उपमुख्यमंत्री शिंदे यांची आयुक्त राव व महापौर पिंपळोलकर यांच्याशी चर्चा झाल्याचे रेपाळे यांनी सांगितले. भुवड कुटुंबाला वैयक्तिकरित्या आर्थिक मदत देत असल्याचे त्यांनी नमूद केले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा