वारीमार्गावर आपत्कालीन स्थितीत तातडीने उपचार देण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून ‘बाइक ॲम्ब्युलन्स’चा वापर करण्यात येत आहे. मात्र, हृदयविकार, पक्षाघात किंवा अपघात झाल्यास तातडीने उपचार देणे गर्दीमुळे अनेकदा शक्य होत नाही. त्यामुळे ‘एअर ॲम्ब्युलन्स’चा निर्णय घेण्यात आला आहे.
Pune Rain: पुण्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’! जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
वारीदरम्यान आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी पालखी मार्गावर ३५३ रुग्णवाहिका, ४३ ठिकाणी अतिदक्षता विभागाची (आयसीयू) सुविधा आणि १५६ प्राथमिक उपचार केंद्रे कार्यरत राहणार आहेत. पंढरपूरमध्येही अतिरिक्त आयसीयू कक्ष, महाआरोग्य शिबिर आणि २४ तास वैद्यकीय सेवा असणार आहे.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी ३,०८७ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच ३०२ तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणी स्रोतांचे निर्जंतुकीकरण, डेंगी, मलेरियावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना, अन्न विक्रेत्यांची आरोग्य तपासणी आणि आरोग्य जनजागृतीवर विशेष भर देण्यात येणार आहे.
Pune News: मावळात रस्ता फुटला? व्हायरल व्हिडिओबाबतचे सत्य अखेर समोर; विकासकामांचा भांडाफोड, टेस्टिंगमध्येच उघड झाला घोळ!
‘एअर अॅम्ब्युलन्स’चा वापर कधी ?
आषाढी एकादशी २५ जुलै रोजी आहे. त्यानुसार २२ ते २९ जुलै या कालावधीत सर्वाधिक गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत ‘एअर ॲम्ब्युलन्स’ची सुविधा उपलब्ध असणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने निविदा काढली असून, येत्या दोन दिवसांत याबाबत निर्णय होणार आहे. आपत्कालीन स्थितीत गंभीर रुग्णांना हेलिकॉप्टरद्वारे जवळच्या रुग्णालयात हलविण्यात येणार आहे. यासाठी सोलापूर येथील हेलिपॅडचा वापर करण्यात येणार आहे.
वारकरी वारीसाठी रातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा घरी पोहोचेपर्यंत पोहोचेपर्यंत आरोग्याच्या आरोग्याच्या सर्व आवश्यक सुविधा पुरवण्याचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. पालखी मार्गावरील खासगी रुग्णालयांमध्ये अत्यावश्यक सेवांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात येणार आहेत. –प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री

