![]()
कर्ट व्होनेगट यांनी आपल्या ‘प्लेयर पियानो’ (1952) याकादंबरीत एका जगाची कल्पना केली होती. तेथे यंत्रांनीबहुतांश उद्योगांचे स्वयंचलन केले आहे आणि संपूर्णव्यवस्था सांभाळण्यासाठी केवळ काही अभियंते वव्यवस्थापक उरले आहेत. इतर सर्व लोकांच्या अन्न वनिवाऱ्याची व्यवस्था सरकार करते, पण त्यांच्या हातातकोणतेही काम नाही. व्होनेगट यांची ही कल्पनादूरदृष्टीची ठरली का? कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)मानवी कार्यशक्तीचा मोठा भाग अनावश्यक ठरवेल,असे आत्ताच निश्चितपणे म्हणता येणार नाही. मात्रएआय मानवी जीवनाच्या अर्थासमोर गंभीर आव्हानेउभी करत आहे, हे निश्चित आहे. आपली बहुतांश कामे ऑटोमॅट सरासरी आपण अधिक समृद्ध होऊ. परंतुयातून समाधानाची पातळीही वाढायला हवी. संशोधन सांगते की तुमचे उत्पन्न दुप्पट झाले, तरी जीवनाचे मूल्यमापन करण्याचे तुमचे निकषही तितकेच कठोरहोतात. पण जीवनाला अर्थ असणे हा वेगळाच विषयआहे. आपण काम करतो, त्यातून आपल्याला केवळ उत्पन्न मिळत नाही; ते आपल्या ओळखीचाही एक भाग असते. उलट हातात कोणतेही काम नसल्यास पूर्ण उत्पन्नमिळत असूनही त्याचा मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. वेतनाबरोबरच काम व्यक्तीला शिस्त,आपलेपणाची भावना, सामाजिक प्रतिष्ठा आणिएखाद्या उद्दिष्टात योगदान दिल्याचे समाधान देते. यागोष्टींचे पुनर्वाटप पैशांप्रमाणे करता येत नाही. प्रत्यक्षातएआय किमान तीन प्रकारे जीवनाच्या अर्थाला आव्हानदेत आहे. तुमच्या उद्देशभावनेला कमकुवत करण्यासाठीएआयने तुमच्यापेक्षा श्रेष्ठ असण्याची गरज नाही; तेकेवळ कार्यक्षम, पुरेसे चांगले आणि कमी खर्चिकअसले तरी पुरेसे आहे. एखाद्या असामान्य व्यक्तीकडून मागे पडणे वेगळे; पणकेवळ ‘पुरेसे चांगले’ असलेल्या तंत्रज्ञानामुळेअप्रासंगिक ठरणे ही पूर्णपणे वेगळी बाब आहे.याशिवाय, एआयवर आधारित मनोरंजन आणि‘सहवास’ (एआयलाच मित्र समजून त्याच्यासोबत वेळघालवणे) लोकांच्या वेळेचा आणि सामाजिकसंबंधांच्या गरजेचा मोठा भाग व्यापू शकतो. जीवनालाअर्थ देणाऱ्या अधिक आव्हानात्मक अनुभवांची जागा तोघेऊ शकतो. सहज, अखंड जवळीक देऊन एआयप्रयत्न, कर्तव्य, परस्परता, निःस्वार्थपणा आणिअसुविधा यांना मागे टाकू शकतो, जे खऱ्या नात्यांसाठीआवश्यक असतात. एआयशी असलेल्या नात्यातआपल्याकडून बदल्यात काहीच अपेक्षित नसते.प्रत्यक्षात ते नाते नसून उपभोगाचा एक प्रकार असतो.डिजिटल जीवनाने आधीच मानवी संबंध बदललेआहेत. तरुणांमध्ये सोशल मीडियाचा वाढता वापरजीवनातील समाधान कमी होण्याशी संबंधित असल्याचेदिसून आले आहे. यात अद्याप एआयची भूमिका नाही, पण यावरून एवढेस्पष्ट होते की डिजिटल माध्यमांमधील अधिक संपर्कम्हणजे मानवी नात्यांमध्ये अधिक खोली असे नाही. खरेतर, जीवनाचा अर्थ क्वचितच आरामाच्या परिस्थितीतसापडतो. तो एखादे निवडलेले ध्येय गाठण्यासाठीकेलेल्या प्रयत्नांतूनच मिळतो. मग ते स्वतःच्या मुलांचेसंगोपन असो किंवा एखाद्या कौशल्यात प्रावीण्यमिळवणे असो. आयुष्याकडे मागे वळून पाहताना लोकएखाद्या अर्थपूर्ण ध्येयासाठी केलेल्या संघर्षालाचअधिक मौल्यवान मानतात. कदाचित म्हणूनच अधिकसमृद्ध आणि विकसित समाज अधिक सुविधाअनुभवतात; पण जीवनाच्या उद्देशाची अधिक सखोलजाणीव त्यांना होत नाही. हेही लक्षात ठेवले पाहिजे की,एआय मानवी क्षमतांपेक्षा पुढे गेला तरी प्रत्येक प्रकारचेकाम संपणार नाही. संगणक बुद्धिबळात माणसांपेक्षाश्रेष्ठ ठरले, तरी लोकांनी बुद्धिबळ खेळणे सोडलेलेनाही. आजही लोक धावतात, स्वयंपाक करतात, संगीतरचतात, फर्निचर तयार करतात आणि प्रत्यक्षसादरीकरणे पाहण्यासाठी महागडी तिकिटे विकत घेतात. (प्रोजेक्ट सिंडिकेट) जीवनात अर्थाचा शोध क्वचितचसुखसोयींच्या कुशीत लागतो. तो एखादेध्येय गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांतूनचसापडतो. मग ते मुलांचे संगोपन असोकिंवा एखाद्या कौशल्यात प्रावीण्यमिळवणे असो. माणूस शेवटी एखाद्याअर्थपूर्ण उद्दिष्टासाठी केलेल्यासंघर्षालाच सर्वाधिक मौल्यवान मानतो.
Source link
कार्ल बेनेडिक्ट फ्रे यांचा कॉलम:आपण केवळ उत्पन्नासाठीच कोणतेही काम करत नाही
