![]()
अनेक संमिश्र, ऊन-सावलीसारख्या भावनांसह मीछत्तीसगडचा निरोप घेतला. या राज्यात मी जवळपासदोन आठवडे घालवले. या काळात रात्री उशिरापर्यंतसाल वनस्पतीच्या दाट जंगलातून मोटारसायकलवरूनप्रवास केला होता. चांदण्यात चमकणारी, पाने गळूनगेलेली पांढरट भुताटकी झाडे एक विलक्षण दृश्य निर्माणकरत होती. दुर्गम आदिवासी वस्तीपर्यंत पोहोचण्यासाठीवाहत्या नद्या पार कराव्या लागल्या. बस्तर आणि कवर्धा येथील प्रवासात मी जंगलाच्या आतअसलेल्या गोंड जमातीच्या गावात राहिले. तेथेवीजेसारखी मूलभूत सुविधाही नव्हती. नक्षलप्रभावितम्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात मी यजमानकुटुंबासोबत शेकोटीजवळ बसून आदिवासीजीवनातील गुंतागुंत व त्याबाबत समाजात प्रचलितगैरसमज समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. धुरवाजमातीचे पारंपरिक उत्सव पाहिले. एका पारंपरिक वैद्याच्या झोपडीत औषधी वनस्पतींसोबतपक्ष्यांचे पंजे व अनेक वर्षांपूर्वी जमा केलेले खवल्यामांजराचे खवलेही पाहायला मिळाले. दुर्गम गावांत धातू आणि बांबूपासून हस्तकला करणाऱ्या कलाकारांनाभेटले. त्यांचे असामान्य जीवन आणि दुर्मीळ कौशल्य‘इतर मागासवर्ग’ या सरकारी वर्गीकरणामागे जणूझाकोळून गेले आहे. स्थानिक आदिवासी बाजारात तेंदूपानाच्या द्रोणात मला लांदा हे तांदळापासून बनविलेले पारंपरिक पेय प्यायला मिळाले. ते किंचित दाणेदार असते. एका विशालमोहाच्या झाडाखाली बैगा जमातीच्या प्रेमळ कुटुंबाचीभेट झाली. ते मोहाची दारू तयार करत होते. सकाळचानाश्ता करून बराच वेळ झाला नसतानाही त्यांनीपानाच्या द्रोणातून त्या गरम आणि तीव्र पेयाची चवचाखल्याशिवाय मला जाऊ दिले नाही. आजहीकपाळावर, हातांवर आणि पायांवर पारंपरिक गोंदणगोंदवून घेणाऱ्या बैगा समाजातील महिलांनाही भेटले. त्या मातीच्या घरांत राहतात आणि अस्वल, बिबट्या,वाघ तसेच जंगलातील इतर प्राण्यांसोबत त्याच परिसरातआपले आयुष्य जगतात.त्या मातीच्या घरांत राहतात आणि अस्वल, बिबट्या,वाघ तसेच जंगलातील इतर प्राण्यांसोबत त्याच परिसरातआपले आयुष्य जगतात. संध्याकाळी तीरथगड धबधब्याच्या प्रचंड वेगानेकोसळणाऱ्या पाण्याच्या तुषारांत उभे राहून मलाअचानक स्वातंत्र्याचीविलक्षण अनुभूती आली होती. तोक्षण आणखी काही काळ अनुभवत राहावे, अशीमनापासून इच्छा झाली होती. मात्र, छत्तीसगडच्याआदिवासी समाजात वावरताना मनात एक खोलउदासीही सतत होती. कारण जुने विधी, पारंपरिकपोशाख, केशरचना, जंगल आणि आदिवासी हाटातीलसामाजिक संवाद या सर्व गोष्टी आधुनिकतेच्या लाटेतहळूहळू वाहून जात आहेत. याकडे मात्र कुणाचे लक्षदिसत नाही. एकेकाळी भरड धान्य, कोदो, शेवगा आणिमोहासारख्या पौष्टिक पारंपरिक अन्नावर आधारलेलाआदिवासींचा आहार आता तांदूळ आणि डाळीपुरतामर्यादित झाला आहे. परिणामी कुपोषण वाढले. जंगलआणि त्यातील संसाधनांचा शाश्वत तसेच‘शून्य-कचरा’ तत्त्वावर वापर करण्याचे त्यांचे समृद्धपारंपरिक ज्ञानही हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.या समुदायांनी शतकानुशतके या अमूल्य जंगलांचेसंरक्षण केले. त्यांनाच जंगलापासून दूर केले गेले आहे.वनसंरक्षणाच्या तथाकथित आधुनिक पद्धतींमुळे हाफटका बसू लागला आहे. अनेक आदिवासी समाजांचा जंगलाशी असलेलापारंपरिक संबंधही आता तुटत चालला आहे. आदिवासीकुटुंबांसोबत राहताना, ताऱ्यांनी भरलेल्याआकाशाखाली एका ओझासोबत भोजन करताना आणिसामाजिकदृष्ट्या प्रगत परंपरांच्या कथा ऐकताना माझ्यामनात एकच विचार वारंवार येत राहिला. आदिवासीवडीलधाऱ्यांची आजची पिढी ही भारताच्या प्राचीनस्वदेशी ज्ञानपरंपरेचे जतन करण्याची आपल्याकडेउरलेली कदाचित शेवटची संधी आहे. निसर्गाशी शाश्वत सहअस्तित्व कसे राखावे, हे ज्ञानत्यांच्याकडे आहे. या समुदायाच्या रक्तात आजही जंगलवाहते. अशा त्यांच्या मुलांना केवळ अकुशल मजूरबनविण्याऐवजी त्यांना निसर्गतज्ज्ञ, पर्यटन मार्गदर्शकआणि वनसंरक्षक म्हणून प्रशिक्षित करता येईल. भौतिक लालसा आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाने ग्रासलेल्याया जगात छत्तीसगडच्या प्रवासाने मला पुन्हा एकदाजाणवून दिले की, ‘प्रगती’च्या दिशेने धावताना आपणवाटेत किती मौल्यवान गोष्टी गमावण्याचा धोका पत्करतआहोत. (हे लेखिकेचे वैयक्तिक मत आहे.) भौतिक लालसा, पर्यावरणाच्या ऱ्हासानेग्रासलेल्या या जगात छत्तीसगडच्याप्रवासाने मला पुन्हा एकदा जाणवून दिलेकी, ‘प्रगती’च्या दिशेने धावताना आपणवाटेत कितीतरी मौल्यवान गोष्टीगमावण्याचा धोका पत्करत आहोत.
Source link
शिव्या नाथ यांचा कॉलम:वनांतील भूमिपुत्रांकडून शिकावेजीवनाशी जुळवून घेण्याचे तंत्र
