Headlines

Raigad bridge collapse; अवजड वाहतुकीमुळे पूल कोसळला; पावसाळ्याच्या तोंडावर आदिवासी वाड्यांचा संपर्क तुटला, शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं काय?


रायगडच्या सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा महत्त्वाचा प्रवासी पूल अचानक कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजनाच्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हा पूल कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Raigad bridge collapse, Amnoli village bridge
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड: सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा महत्त्वाचा प्रवासी पूल अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची मालवाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे हा पूल कोसळल्याची गंभीर बाब समोर आली असून, ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक गावांचा संपर्क तुटल्याने नागरिकांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

या गावांसाठी होता महत्त्वाचा दुवा

जांभूळपाडा मार्गे आमणोली, दहिगाव, कोलतरे तसेच परिसरातील आदिवासी वाड्यांकडे जाण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जात होता. कमी वजन क्षमतेचा आणि अरुंद असलेला हा पूल स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी एकमेव पर्याय होता. मात्र, काही उद्योजक आणि व्यावसायिकांकडून या पुलावरून सातत्याने डंपर आणि हायवा सारख्या अवजड वाहनांची वाहतूक केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

प्रशासनाने दखल घेतली नाही

स्थानिकांनी याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्याचे सांगितले जात आहे. तरीही अवजड वाहनांची वाहतूक सुरूच राहिल्याने अखेर पुलाने भार सहन न करता कोसळल्याची चर्चा आहे. “प्रशासनाने वेळेत दखल घेतली असती, तर ही वेळ आली नसती,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

Maharashtra TimesNagpur Crime: ‘मला शेवटचं बघून घे’; प्रेयसीशी Video Call सुरू असतानाच तरुणाचं टोकाचं पाऊल, धक्क्यातून तरुणीनेही…

नागरिकांवर संकट

पावसाळा अगदी तोंडावर असताना पूल कोसळल्याने आता स्थानिक नागरिकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. दैनंदिन प्रवास, बाजारपेठ, आरोग्य सेवा आणि शालेय विद्यार्थ्यांच्या ये-जा यावर त्याचा थेट परिणाम होणार आहे. काही दिवसांत शाळा आणि महाविद्यालये सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.

नव्या पुलाची मागणी

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच हेमलता शेरेकर यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अंकुश सांगळे, पोलीस हवालदार कल्पेश कांबळे, गणेश भोईर, मिलिंद कांबळे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. या घटनेनंतर पुलांच्या सुरक्षेबाबत आणि अवजड वाहनांच्या नियंत्रणाबाबत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. नागरिकांनी तातडीने पर्यायी व्यवस्था उभी करण्याची तसेच नवीन मजबूत पूल उभारण्याची मागणी केली आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा