ठाणे महापालिका आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. तब्बल 116 कर्मचाऱ्यांच्या एकाचवेळी बदली करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या तक्रारीनंतर ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी हा निर्णय घेतला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
विनित जांगळे, ठाणे : ठाण्यात फेरीवाल्यांनी पदपथ आणि रस्ते व्यापले आहेत. या समस्येमुळे सर्वसामान्यांना चालण्यासाठीही जागा शिल्लक नसल्याने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या टीकेचा धनी झालेल्या वादग्रस्त अतिक्रमण विभागाबाबतच्या तक्रारीनंतर येथील कर्मचाऱ्यांच्या ‘होलसेल’ बदल्या करण्याचा निर्णय पालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी घेतला. एकूण 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले. बदली झालेल्या ठिकाणी कर्मचारी हजर न झाल्यास तात्काळ शिस्तभंगाची कारवाई होणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
ठाण्यात प्रभाग स्तरावरील अतिक्रमणे, फेरीवाले, हातगाडीधारक तसेच अनधिकृत व्यवसायांवर होणारी कारवाई अधिक प्रभावी, पारदर्शक आणि सातत्यपूर्ण व्हावी, यासाठी आयुक्त सौरभ राव यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रभाग समिती स्तरावरील अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागात कार्यरत 116 कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले.
अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश का?
शहरातील विविध अतिक्रमणांविरोधात कठोर आणि नियमित कारवाई करण्याची मागणी नागरिक, लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांकडून सातत्याने केली जात होती. या मुद्द्यावरून गेल्या आठवड्यात महासभेतही सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर आरोप केले. यावेळी अनेक कर्मचारी दीर्घकाळ एकाच प्रभागात कार्यरत असल्याने अतिक्रमणविरोधी मोहिमांमध्ये अपेक्षित सातत्य आणि परिणामकारकता दिसून येत नसल्याबाबतही वारंवार सूचना प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.
‘या’ पदांवरील कर्मचाऱ्यांची बदली
या आदेशानुसार नऊ प्रभाग समित्यांमधील अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागात कार्यरत असलेल्या वरिष्ठ लिपिक, लिपिक, शिपाई, बिगारी आणि सफाई कर्मचारी अशा विविध पदांवरील एकूण 116 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
तोडक कारवाईची प्रतीक्षा
बदल्या केल्यानंतरही या विभागात नव्याने रुजू होणारे कर्मचारी तात्काळ पुन्हा एकदा स्थानिक पातळीवरील फेरीवाला आणि भू माफियांशी संगनमत करून अतिक्रमणांवर थातूरमातूर कारवाई करतात, असा आरोप वारंवार होतो. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन अधिनकृत बांधकामे आणि फेरीवाल्यांवर प्रत्यक्षात कठोर कारवाई केव्हा करणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
महासभेतही अतिक्रमण कर्मचाऱ्यांवरून फैरी
ठाण्यातील नौपाडा परिसरात राम मारुती रस्त्यावर काही दिवसांपूर्वी फेरीवाल्यांच्या कारवाईदरम्यान गोंधळ झाला होता. स्थानिक भाजप नगरसेवक सुनेश जोशी आणि मृणाल पेंडसे यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यासाठी आलेल्या पालिका पथकाला विरोध करण्यात आला. या मुद्द्यावरून पालिकेच्या महासभेत जोशी यांनी प्रशासन स्थानिक हफ्ते वसुली करणाऱ्या माफियांचा उल्लेख करत पुरावे सादर केले. तसेच या फेरीवाल्यांना कारवाईबाबत आधीच माहिती मिळते. स्थानिक अधिकारी आणि यंत्रणा प्रचंड कुचकामी असल्याचे नगरसेविका पेंडसे यांनीही नमूद केले.
प्रशासनाने दिले होते कारवाईचे आदेश
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात पादचाऱ्यांना चालण्यासाठीही जागा नसल्याचे स्थानिक नगरसेवक संजय वाघुले यांनी सांगितले. शिवसेनेच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी शहराबाहेरून फेरीवाले याठिकाणी येऊन व्यवसाय करतात, असा आरोप केला. त्यांच्याकडून पावतीच्या माध्यमातून पैसे गोळा होतात. त्याचा कोणताही हिशोब नसतो, असेही शिंदे यांनी सांगितले. याबाबत पालिका प्रशासनाकडून बाजू मांडताना उपायुक्त गजानन गोदापुरे यांनी दोषींवर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा