Headlines

Jalna Antarwali Sarati Maratha Reservation Manoj Jarange Patil and MLA Prasad Lad Meet; एकीकडे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा इशारा, दुसरीकडे CM फडणवीसांचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला; केलं मोठं आवाहन…


Jalna Maratha Reservation Manoj Jarange and Prasad Lad Meeting : मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तलवार उपसली आहे. 30 मेपासून आमरण उपोषण सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज भाजपचे आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचले आहेत, आणि यावर सध्या दोघांमध्ये चर्चा सुरु आहे.

Jalna Maratha Reservation Manoj Jarange and Prasad Lad Meeting
मनोज जरांगे आणि प्रसाद लाड भेट(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जालना : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. 30 मेपासून उपोषणाला सुरुवात करणार असून अंतरवाली सराटीतच हे आमरण उपोषण होणार असल्याचं जरांगेंनी सांगितलं आहे. पण त्याचदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिष्टमंडळातील आमदार प्रसाद लाड हे मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचले आहेत. अंतरवाली सराटीतच त्यांची चर्चा सुरु आहे. ‘अनेकदा माझे आणि मनोजदादांचे वाद झाले आहेत. पण आरक्षण मिळालं ते मनोजदादांच्या आंदोलनामुळेच. फडणवीसांना दादांनी समजून घेणं गरजेचं आहे. 30 मे रोजी जरांगेंनी आंदोलन करु नये’, असं आवाहन प्रसाद लाड यांनी यावेळी केलं आहे.

प्रसाद लाड काय म्हणाले?

‘एक आमदार, नेता म्हणून नाही तर सर्वसामान्य म्हणून भेटीला आलोय. मनोज जरांगे हे समाजाचं दैवत आहेत. त्यांनी आवाहन केलं म्हणून एक दिवस आधीच आलो. माझ्याविषयी तुमच्या मनात द्वेष असेल तर ते मला दूर करायचे आहेत. समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत. दादांच्या सात-आठ मागण्या मी समजून घेणार आहे. मागण्या का मान्य झाल्या नाहीत? त्या अडचणी समजून घेणार आहे. समाजाच्या अडचणी दूर झाल्या नाहीत, तर आमदारकीचा राजीनामा देणार. समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत. मनोज जरांगेंचे विषय मी सरकार दरबारी मांडणार’, असंही लाड यावेळी म्हणाले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्याबाबत सवाल केला असता ते म्हणाले की, ‘हाकेसाहेबांना जरांगेंच्या मागण्यांवर पोटशूळ उठण्याचं कारण नाही. हाकेंनी मागण्यांबाबत गैरसमज करु नये. हाकेंनी चर्चेला बोलावलं तर त्यांच्याकडेही जाईल’, असं म्हणत प्रसाद लाड यांनी स्पष्टीकरण दिलं.
Maharashtra TimesChandrapur Tiger Attack : तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला, चौघींचा जागीच अंत, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता महाराष्ट्रातील मोठी घटना

धमकीचे फोन अनेक वर्षे येतात

आज सकाळी प्रसाद लाड यांच्या पीएच्या फोनवर एक धमकीचा फोन आला होता. त्याबाबत प्रश्न केला विचारला असता ते म्हणाले की, ‘मला धमकीचे फोन अनेकवर्षे येतात. मी त्यावर लक्ष देत नाही. काल रामा इंटरनॅशनलमध्ये काही जणांनी घुसण्याचा प्रयत्न केला. धमकी देणारे मराठा समाजातले कार्यकर्ते असल्याचं समजलं. मी समाजासाठी दादांच्या आवाहनावर इथे आलोय, धमक्या कशाला? आणि तसं असेल तर मी समाजासाठी मरायला तयार आहे’, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे.

जरांगेंनी उपोषण करु नये…

‘मी युद्ध पेटवायला आलेलो नाहीय, गीतेतला सार घेऊन आलोय. दादांचा हात माझ्या डोक्यावर राहिला तर समाजाचे प्रश्न तडीस जातील. मी आणि जरांगे भाऊ, आमच्यात भांडणं लावू नका. दादांसाठी मी विविध मुद्द्यांचे कागदही घेऊन आलोय. विकास महामंडळाला काल दीडशे कोटींचा निधी मिळाला, अभिनंदन करायला हवं. दादांनी यापुढे उपोषण करु नये मी माझी विनंती आहे. 30 मे या दिवशी जरांगेंनी उपोषण आंदोलन करु नये’, अशी मागणी प्रसाद लाड यांनी यावेळी केलीय.
Maharashtra TimesBandra Terminus Metro: ‘मेट्रो-११’चा वडाळा ते वांद्रे विस्तार; गरीब नगर येथील अतिक्रमणमुक्तीनंतर हालचाली, भुयारी मेट्रोने प्रवास वेगवान होणार

मनोज जरांगे काय म्हणाले?

‘सारथी अंतर्गत विद्यार्थ्यांची संख्या का कमी केली? 80 हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती का थांबवली? मुख्यमंत्री ही व्यक्ती आमच्यासाठी शत्रू नाहीय. आमच्या आईला मारलं तर आम्ही त्यांच्या आईवर का बोलू नये?’, असे सवाल जरांगेंनी लाड यांना विचारले. पुढे ते म्हणाले की, ‘रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आईला पाणीही दिलं नाही. फडणवीस म्हणाले माझे पोलीस आहेत, मग जनता तुमची नाही? अंतरवालीत आमच्यावर अन्याय का केला? आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्‍याबाबत वाईट बोललो होतो का? मालकत्व, पालकत्व स्वीकारायचं असेल तर टीकाही सहन करायला हवी. मराठ्यांनी तुमचं काय पाप केलंय? मुख्यमंत्री आमच्या जातीचा नसूनही आरक्षण दिलं, कुणी नाकारलं?’, असे एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार मनोज जरांगेंनी यावेळी केला आहे. आता या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील उपोषणाबाबत काय निर्णय घेतात, यावर सर्वाचं लक्ष लागून आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा