Headlines

सुपीक जमिनी कवडीमोल दराने उद्योजकांच्या घशात; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप – vijay wadettiwar alleged govt plotting to give fertile lands of farmers in gadchiroli district to industrialists pri


Vijay Wadettiwar: जिल्ह्याला स्टील हब बनविण्याचे स्वप्न दाखविले जात आहे, पण प्रत्यक्षात येथील खनीज संपत्तीवर डोळा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

wadettiwar
wadettiwar(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली: जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी कवडीमोल दराने उद्योजकांच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत केला.

वडेट्टीवार म्हणाले , जिल्ह्याला स्टील हब बनविण्याचे स्वप्न दाखविले जात आहे, पण प्रत्यक्षात येथील खनीज संपत्तीवर डोळा आहे, त्यासाठीच खाणपट्ट्यांचे खुले लिलाव न करता जिंदालसारख्या कंपनीला अल्प महसूलावर लोहखनिज देण्याचे षडयंत्र रचण्यात येत आहे. यातून सत्तेतील तीनही पक्षाला लाभ मिळणार असल्याचा आरोप त्यांनी केला. जेएसडब्लू कंपनीने गडचिरोलीत एक लाख कोटीची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले. मात्र, त्यांना देण्यात आलेल्या खाणपट्ट्याची मुदत संपली आहे.
Maharashtra Timesटीआरपीसाठी धडपड, आव असा आणताहेत, जणू ते स्वातंत्र्यवीरच; नीलम गोऱ्हेंची राऊतांवर टीका
त्यामुळे नव्याने खुल्या पद्धतीने लिलाव करून हा पट्टा जिंदालला द्यायला हवा. त्यामुळे सरकारी तिजोरीत प्रती टन २३०० रुपयांचे स्वामित्व शुल्क जमा होईल, असे ते म्हणाले. यावेळी खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार रामदास मसराम, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महिला जिल्हाध्यक्षा ॲड. कविता मोहरकर, माजी नगराध्यक्ष ॲड. राम मेश्राम, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेट , युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव ॲड. विश्वजित कोवासे उपस्थित होते.
Maharashtra Timesमोठा दिलासा! भटके-विमुक्तांना आता राज्यात कुठेही मिळणार रेशन; जातप्रमाणपत्र, आधारसह १५ मागण्यांवर निर्णय
शेतकऱ्यांना प्रति हेक्टर एक कोटी द्या
देसाईगंज येथील प्रस्तावित एमआयडीसीत जेएसडब्लू कंपनी लोह प्रकल्पासाठी जवळपास २३०० हेक्टर जमीन खरेदी करणार आहे. ग्रामीण भागात ६ ते ७ लाख प्रति हेक्टर आणि शहरी भागात २५ ते २८ लाख प्रति हेक्टर मोबदला देण्यात येणार आहे. येथे मोठ्या प्रमाणात सुपीक जमीन आहे. शेतकऱ्यांना सरसकट एक कोटी प्रति हेक्टर आणि दोन एकर मागे एकास नोकरी द्यावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली, अन्यथा काँग्रेस गावागावात जाऊन याचा विरोध करणार, असा इशारा दिला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा