Headlines

Gondia News: सर्व मित्र पास झाले, मीच नापास; नैराश्यातून बारावीच्या विद्यार्थ्याने वाढदिवशीच संपवलं जीवन – hsc student ends his life on birthday due to depression after failing exam pri


12th Student Ends Life: बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने नैराश्यातून विद्यार्थ्यांने वाढदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजता आमगाव येथे घडली.

hsc student ends life
hsc student ends life(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा. वृत्तसेवा, गोंदिया: बारावीच्या परीक्षेत नापास झाल्याने नैराश्यातून विद्यार्थ्यांने वाढदिवशीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी २ वाजता आमगाव येथे घडली. क्रिष्णा धर्मराज शिवणकर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार क्रिष्णा शिवणकर हा आमगाव येथील आदर्श कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेत होता. यावर्षी त्याने बारावीची परीक्षा दिली. ५ मे रोजी निकाल जाहीर झाला. यात क्रिष्णा नापास झाला. आपले सर्व मित्र पास झाले, मीच नापास झालो यातून त्याला नैराश्य आले. यामुळे गेल्या दोन दिवसांपासून तो नाराज असल्याचे बोलल्या जाते. बुधवारी ७ मे रोजी क्रिष्णाचा वाढदिवस होता. पुन्हा चांगला अभ्यास कर आणि पास हो असे प्रोत्साहन त्याच्या आई-वडिलांनी दिले. मात्र क्रिष्णाच्या मनात काही वेगळेच सुरू होते. घरी कुणीही नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे आईवडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
Maharashtra Timesनागपूरकरांचे आरोग्य धोक्यात! धूर अन् धुळीमुळे वाढताहेत दम्याचे रुग्ण, AQI धोकादायक पातळीवर
या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीयावर मोठा आघात झाला आहे. धर्मराज शिवणकर यांचे आमगाव येथे छोटे हॉटेल आहे. सुट्टीच्या दिवसात क्रिष्णा वडिलांना मदत करायचा. कुटुंबीयांनी या घटनेची माहिती आमगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
Maharashtra Timesमधाच्या गावांना सरकारकडून निधीचे बळ; राज्यातील १० गावांसाठी पाच कोटी मंजूर
जेईईमुळे बाराबीच्या गुणांमध्ये घट
सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपले सगळे लक्ष इंजिनीअरिंग किंवा मेडिकलच्या प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण करण्यावर केंद्रित केल्याने बारावीच्या शालांत परीक्षांना दुय्यम स्थान मिळाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून शालांत परीक्षांमधील सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांच्या एकंदर गुणांमध्ये घट झाली आहे. सोमवारी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये, नागपूर विभागात कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी विभागातील टॉपर म्हणून स्थान मिळविले. एकंदर निकालातही सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांना तुलनेने कमी गुण मिळाले असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या लेखी शालांत परीक्षेचे महत्व कमी झाल्यामुळे तेथील कामगिरीही खालावली आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा