Headlines

CM Devendra Fadnavis : मनसे-ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर मुख्यमंत्र्यांची थोडक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, ‘दोघांच्या युतीशी माझा संबंध…’ – cm devendra fadnavis reacted on mns-shivsena uddhav thackeray possible alliance maharashtra politics


गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीचे संकेत मिळत आहेत. दोन्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून युतीसाठी सकारात्मकता दाखवली जात आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. यावर आता राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहे. यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही ( CM Devendra Fadnavis ) या संभाव्य युतीवर भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र गडचिरोली दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनसे आणि ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले, ‘मी आत्ताच यावर प्रतिक्रिया देणार नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवर मी योग्य वेळी बोलेल. कारण या दोघांच्या युतीशी माझा काहीही संबंध नाही. त्यामुळे माझ्या राजकीय अनुभवावरुन मी योग्य वेळी बोलेल.’

उद्धव ठाकरेंनी मनसे-सेना युतीबाबत बोलताना एका वाक्यात महत्वाचे भाष्य केले. पत्रकरांनी प्रश्न विचारताच ठाकरे म्हणाले ‘बघूया महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होणार,’ पुढे ठाकरेंनी ‘संदेश कशाला? थोड्या दिवसांत बातमीच देतो,’ असे थेट विधान केले आणि आपल्या शिवसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मनातही कोणताच संभ्रम नाही, असेही नमूद केले.

दरम्यान संजय राऊतांनीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा फोनही झाला आहे, अशी माहिती दिली. ‘राज ठाकरे यांचे घर आमच्यासाठी दुसरे घर आहे, आम्ही युतीबाबत सकारात्मक आहोत, म्हणून खाली कार्यकर्त्यांचे मनोमिलन सुरू आहे. नेत्यांनी सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलं आहे.’ असे संजय राऊतांनी नमूद केले. त्यामुळे मनसे आणि ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चांना आता बळ मिळालं आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्समधून वेब पत्रकारितेला सुरुवात केली, गेले एक वर्ष कन्सलटन्ट म्हणून काम करत आहे. डिजिटल पत्रकारितेत वृत्त संकलन, सोशल मीडियाचे व्यवस्थापन आणि फिल्ड रिपोर्टिंगचा अनुभव आहे. याआधी त्यांनी आर. एन. ओ. वृत्तसंस्थेसाठी फिल्ड रिपोर्टर म्हणून कार्य करत असताना विविध सामाजिक, राजकीय व स्थानिक विषयांवर रिपोर्टिंग केले आहे. तसेच, त्यांनी सामना आणि लयभारी या माध्यमांमध्ये सोशल मीडिया हँडलर म्हणूनही काम पाहिले आहे. त्या मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर प्राप्त आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत