Gondiya No Water in Lakes : गोंदिया जिल्ह्यातील तलावांची अवस्था गंभीर आहे. अनेक तलावांमध्ये पाणीसाठा संपला आहे. ३८ पैकी केवळ आठ तलावांमध्ये थोडा पाणीसाठा शिल्लक आहे. शासनाने निधी देऊनही परिस्थितीत सुधारणा झालेली नाही. अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस होऊनही तलावांची स्थिती चिंताजनक आहे.

पूर्व विदर्भातील गावांसोबतच वन्यजीवांची तहान माजी मालगुजारी तलावांच्या माध्यमातून भागविली जाते. सिंचनासाठीदेखील हे तलाव उपयुक्त ठरतात. पण, गोंदिया जिल्ह्यातील अधिक पाणीसाठवणूक क्षमता असलेल्या प्रमुख ३८ माजी मालगुजारी तलावांपैकी ३० मध्ये पाण्याचा ठणठणाट आहे. उर्वरित आठ तलावांमध्ये काही प्रमाणात पाणी उरल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. सरकारी व्यवस्थेच्या दुर्लक्षामुळे हा जलठेवा संकटात सापडल्याचा आरोप यानिमित्ताने होऊ लागला आहे.
स्कूलबस चालकांची दररोज तपासणी होणार, विद्यार्थ्यांसाठीचे सुरक्षा उपाय अधिक कडक; शालेय शिक्षण विभागाकडून नियमावली जाहीर
ब्रिटिशांच्या काळात १९०८मध्ये प्रकाशित ‘इम्पिरियल गॅझेटियर ऑफ इंडिया’च्या आठव्या खंडात पूर्व विदर्भातील मालगुजारी तलावांचा उल्लेख सापडतो. या तलावांचा इतिहास किमान तीनशे-साडेतीनशे वर्षांपूर्वींचा आहे. पण, आज गोंदिया जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांची स्थिती गंभीर असताना भानपूर तलावात ३८.५४ टक्के, बोपाबोडीत २२.७३ टक्के, चिरचाडी २४.३९ टक्के, गोठणगाव २१.९२ टक्के, कोसबिबकी १६.८६, माहुली २०.४४ टक्के, नंदलपार १८.९७ टक्के तर पुतळी तलावात २३.५४ टक्के पाणीसाठा आहे. हा दिलासा असला तरी हजारोच्या संख्येत असलेले तलाव आता बोटावर मोजण्याइतके शिल्लक राहिले आहेत.
Ashadhi Ekadashi : आषाढी यात्रेत विठ्ठलाचे २४ तास दर्शन, मंदिर परिसरात कशी आहे सुविधा? कामे शेवटच्या टप्प्यात
अधिक पाऊस तरी गंभीर स्थिती
गोंदिया जिल्ह्यात सरासरी १३६८.३२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. २०२४मध्ये जिल्ह्यात सरासरी १४८८.४८ मिमी पाऊस बरसला होता. म्हणजेच, सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही प्रकल्पांसोबतच तलावांतही पाणीसाठा शिल्लक नाही. २०२३मध्ये १३१०.१८ मिमी पाऊस झाला होता.
२११ कोटींचा निधी मंजूर तरीही…
मागील काही वर्षांत तलावांच्या दुरुस्तीच्या अनुषंगाने निधी दिला जाऊ लागला आहे. २०१६-१७मध्ये ६ हजार ८६२ मामा तलावांसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. २०१७मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस फाउंडेशननेही यासाठी ३० कोटी रुपये दिले. मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी २११.५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता दिली असल्याची माहिती आहे. या निधीतून माजी मालगुजारी तलावांचे पुनरुज्जीवन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पावसाच्या भीतीमुळं अख्खं मेट्रो स्टेशन ताडपत्रीनं झाकलं? BKCमधील प्रकार
कुठे किती टक्के ?
ककोडी, काटी, कोसमतोडी, मुंडीपार, निमगाव : शून्य टक्के
गिरोला, मंगेडारी, खैरी, मालीजुंगा, मोरगाव, पळसगाव-डव्वा, ताडगाव : ०१ टक्के
भिवखिडकी, चानाबाक्टी, चिरचाळबांध, धाबेटेकडी, फुलचूर, कवठा, कोहलगाव, खमारी, कोकणा, खोडशिवनी, खाडीपार, लेंडेडारी, मेंढा, माहुरकुडा, पळसगाव सौं., पालडोंगरी, सौंदड, तेढा : ५ ते १० टक्के

