Headlines

Chandrapur mayor election bjp gets support from prakash ambedkar vanchit and uddhav thackeray shiv sena; राजकीय उलथापालथ! भाजपने ठाकरेंना आपल्या खेचलं, वंचित आणि एमआएमलाही जवळ केलं


चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत मोठा आणि अनपेक्षित राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या संगीता राजेंद्र खांडेकर या अवघ्या एका मताच्या फरकाने महापौर म्हणून निवडून आल्या आहेत. वंचितचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने आणि एमआयएमचा एक नगरसेवक तटस्थ राहिल्यामुळे भाजपचा विजय सुकर झाला. या निकालामुळे चंद्रपूरच्या राजकारणात खळबळ उडाली असून, काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद आणि गटबाजीचा थेट फायदा भाजपला झाल्याचं स्पष्टपणे दिसून आलं आहे.

या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्ष यांच्यात युती झाली असून, त्यानुसार महापौरपदाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. भाजप नेते किशोर जोरगेवार यांनी युतीची अधिकृत घोषणा करताना सांगितलं की, चंद्रपूर महानगरपालिकेत भाजप, शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडीच्या काही नगरसेवकांचा समावेश असलेली आघाडी सत्तास्थापन करणार आहे.

जोरगेवार यांनी सांगितलं की, भाजपकडे २४ नगरसेवक असल्याने पहिला महापौर भाजपचाच असणे अधिक योग्य होते. चंद्रपूरचा विकास भाजपच करू शकतो, हे अनेक नगरसेवकांना पटले आणि त्यामुळे ते आमच्यासोबत आले, असा दावा त्यांनी केला. संगीता खांडेकर यांच्या नावाने पक्षाने अधिकृत व्हीप काढला होता आणि त्यानुसार मतदान झाले.

दरम्यान, शिवसेना (उबाठा) शहराध्यक्ष संदीप गिऱ्हे यांनी काँग्रेसवर अप्रत्यक्ष टीका करताना सांगितलं की, सुरुवातीपासूनच शिवसेनेची भूमिका महापौरपदासाठी ठाम होती. काँग्रेससोबत चर्चा सुरू असतानाही पाच वर्षांत एकदाही महापौरपद देण्याची तयारी काँग्रेसनं दाखवली नाही. त्यामुळे भाजपशी चर्चा करून नवा फॉर्म्युला ठरवण्यात आला. या फॉर्म्युल्यानुसार उपमहापौरपद पाचही वर्षे शिवसेनेकडे राहील, तर स्थायी समिती अध्यक्षपद पहिल्या आणि चौथ्या वर्षी शिवसेनेला दिले जाईल.

दरम्यान, या सत्ताबदलामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. एकीकडे भाजप शिवसेना (उबाठा) युती सत्तेवर येत असताना, दुसरीकडे काँग्रेसला अंतर्गत कलहाचा मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. आगामी काळात या नव्या युतीकडून शहराच्या विकासासाठी कोणते निर्णय घेतले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत