Headlines

Husband killed wife madhuri and buried her body in the ground mystery revealed due to jcb pit; पत्नी माधुरीची हत्या करून पतीने मृतदेह जमिनीत पुरला, जेसीबीच्या खड्डयामुळे रहस्य उलगडले


Wardha Murder Case: वर्ध्यात एका व्यक्तीने पत्नीची हत्या केल्याचे समोर आले अशून आरोपीने पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत पुरला होता. तसंच त्याने पोलिसात पत्नी हरवल्याची तक्रार नोंदवली. मात्र तपासात पतीच खुनी असल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपी पती सुभाष वैद्यला शोधायला सुरुवात केली आहे.

wardha murder
पत्नी हरवल्याची तक्रार; जेसीबीच्या खड्डयामुळे माधुरीच्या मृत्यूचे रहस्य उलगडले(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, वर्धा: घरातील सततच्या वादातून पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. माधुरी वैद्य (२८) असे मृत पत्नीचे नाव आहे. पत्नीला संपवल्यानंतर नराधम पतीने गुन्हा दडवण्यासाठी जेसीबीने खड्डा खोदून मृतदेह पुरला आणि नंतर स्वत: पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस तपासात पतीच मारेकरी असल्याचे स्पष्ट झाले असून एखाद्या चित्रपटाला साजेशी ही घटना हिंगणघाटमध्ये शुक्रवारी समोर आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी सुभाष लक्ष्मण वैद्य याचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैद्य दाम्पत्य हिंगणघाटच्या इंदिरा वॉर्डात वीस दिवसांपूर्वी राहायला आले. १९ ऑगस्ट रोजी सुभाष याने पत्नी हरवल्याची तक्रार हिंगणघाट पोलिसांत दिली. तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला. सुभाषला विचारणा करण्यात आली असता तो योग्य उत्तरे देत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. माधुरीच्या कुटुंबीयांनीही संशय व्यक्त केल्याने पोलिसांच्या संशयाला बळ मिळाले. त्यांच्या घराजवळ जेसीबीच्या सहाय्याने पावसाचे पाणी जाण्यासाठी खोल खड्डा करण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हा खड्डा नेमका कशासाठी खोदला, कशाने बुजवण्यात आला म्हणून चौकशी केली. जेसीबी मालकाला विचारणा करण्यात आली. पोलिसांनी फॉरेन्सिक चमू आणि डॉग स्कॉडच्या मदतीने शोध सुरू केला. शुक्रवारी खड्ड्याचे खोदकाम सुरू करण्यात आले असता माधुरीचा मृतदेह आढळला. याप्रकरणात सुभाष याच्या मामाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने खड्डा बुजविण्यासाठी मदत केल्याची माहिती आहे.

Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar Crime : मोकळ्या प्लॉटवर ढोल ठेवण्यास नकार, कुटुंबावर धारदार शस्त्राने हल्ला, एकाचा मृत्यू; संभाजीनगर हादरलं

…अन्‌ बळावला संशय

माधुरी ही सुभाष वैद्य याची दुसरी पत्नी होती. पहिल्या पत्नीपासून तो काही वर्षांपूर्वीच विभक्त झाला होता. विवाहाच्या काही दिवसांतच दोघांमध्येही वाद वाढले होते. दोन दिवसांपासून माधुरीचे कुटुंबीय तिला फोन करण्याचा प्रयत्न करत होते. फोन लागत नसल्याने त्यांची चिंता वाढली. त्यांनी सुभाषला फोन करून विचारणा केली. तो टाळटाळ करणारी उत्तरे देत होता. तसंच माधुरी ही माहेरी गेल्याचेही सांगत असल्याने संशय बळावला. पोलिसांनाही त्यांनी याविषयीची माहिती दिल्याने तपासाला आधार मिळाला.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा