Smart Meter Project : ऊर्जा मंच हे स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात नाही. मात्र, नागरिकांच्या मनातील शंका वाढलेल्या आहेत. काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिल वाढल्याच्या तक्रारीही समोर आलेल्या आहेत. यामुळे अशा तक्रारी कमी करण्यासाठी तसेच जनतेमध्ये स्मार्ट मीटरबाबत विश्वास वाढावा. यासाठी स्मार्ट मीटर आणि जुन्या वीज मीटर एकत्रित ठेवून प्रात्याक्षिक जनतेला दाखविण्यात यावे. तसेच आधी शासकीयकार्यालय, शासकीय निवास तसेच ज्या भागांमध्ये वीजचोरी जास्त अशा भागांमध्ये स्मार्ट मीटर बसवावे. अशी मागणीही ऊर्जा मंचच्या वतीने करण्यात आली.

४८ तासांत स्मार्ट मीटर लावण्याबाबत एसएमएस
ऊर्जा मंचाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषेदत हेमंत कपाडिया यांच्यासह प्रसाद कोकीळ, विनोद नांदापूरकर, ओमप्रकाश राठी, दिनेश पवार आणि शरद चौबे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी हेमंत कपाडिया यांनी सांगितले, ‘राज्यभरात वीज ग्राहकांच्या मोबाइलवर ४८ तासांत स्मार्ट मीटर लावण्याबाबत एसएमएस आणि व्हॉट्स मेसेज पाठविण्यात येत आहे. स्मार्ट मीटरबाबत समाजात अनेक समज-गैरसमज पसरलेले आहेत. असे असतानाही स्मार्ट मीटर लावण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
Kinjal Shah : विलेपार्ले स्टेशनजवळ इलेक्ट्रिक कारची धडक, भाजी खरेदीला आलेल्या विवाहितेचा अंत, 11 वर्षांचा लेक मायेला मुकला
स्मार्ट मीटर लावण्याबाबत ऊर्जा मंचाला आक्षेप नाही. मीटर बसविताना ग्राहकांना माहिती देणे, शेवटचे रीडिंग काय आहे, याचीही माहिती दिली जात नाही. ग्राहकांना माहिती नसताना हे स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. मग हा उद्योग कशाला? यामुळे स्मार्ट मीटरबाबत लोकांमध्ये असलेल्या संशयाला अधिक बळ मिळत आहे, असेही मत ऊर्जा मंचाच्या सदस्यांनी उपस्थित केला. प्रसाद कोकीळ, विनोद नांदापूरकर यांनी स्मार्ट मीटरबाबत नियमांची अंमलबजावणी होत नाही. उलट कायदेशीर कारवाईचा धाक आणला जात आहे, असे सांगितले.
आधी जनजागृती करा
ऊर्जा मंच हे स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात नाही. मात्र, नागरिकांच्या मनातील शंका वाढलेल्या आहेत. काही ठिकाणी स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिल वाढल्याच्या तक्रारीही समोर आलेल्या आहेत. यामुळे अशा तक्रारी कमी करण्यासाठी तसेच जनतेमध्ये स्मार्ट मीटरबाबत विश्वास वाढावा. यासाठी स्मार्ट मीटर आणि जुन्या वीज मीटर एकत्रित ठेवून प्रात्याक्षिक जनतेला दाखविण्यात यावे. तसेच आधी शासकीयकार्यालय, शासकीय निवास तसेच ज्या भागांमध्ये वीजचोरी जास्त अशा भागांमध्ये स्मार्ट मीटर बसवावे. अशी मागणीही ऊर्जा मंचच्या वतीने करण्यात आली.
Nashik Sangamner Pune Railway Project : नाशिक-संगमनेर-पुणे रेल्वे प्रकल्पाला रेड सिग्नल, प्रकल्पाचे भवितव्य पुन्हा एकदा अंधारात; कारण काय?
पैसेही जनतेचेच
स्मार्ट मीटर बसविण्याचे मराठवाड्याचे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसविण्याचा खर्च ग्राहकांकडून घेणार नसल्याचा दावा केला जात आहे. राज्यभरात स्मार्ट मीटर बसविण्यासाठी तेहतीसशे कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. हा खर्च जनतेचाच आहे. स्मार्ट मीटरच्या नावाखाली जुने मीटर काढून भंगार करणे हा राष्ट्रीय संपत्ती तसेच जनतेच्या खर्चाचा अपव्यय नाही का? असा सवालही ऊर्जा मंचने उपस्थित केला आहे.

