Headlines

Mumbai Muharram Poison Plot Fayyaz Premji targets 15000 Capsule with Zinc Phosphide Crime News; पत्नी सोडून गेली, समाजाबद्दल द्वेष; फय्याज 15000 मुंबईकरांच्या जीवावर उठला, सलमानच्या सतर्कतेने अनर्थ टळला


Fayyaz Premji : पत्नी सोडून गेली, भाऊ-वहिनीसह कुटुंबीय प्रेमाने वागवत नसल्याने फय्याज मानसिक दडपणात होता. वेगवेगळ्या प्रकारची औषधे-गोळ्यांचे तो सेवन करायचा. ही सर्व परिस्थिती आपल्या समाजामुळेच झाल्याची भावना फय्याजच्या मनात रुजली होती.

Mumbai Muharram Poison Plot Fayyaz Premji Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मोहरमच्या मिरवणुकीत भाविकांना ठार मारण्याचा कट रचणारा फय्याज प्रेमजी याच्या वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात उलथापालथ झाल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडल्याचे तपासात समोर आले आहे. या परिस्थितीला आपलाच समाज जबाबदार असल्याच्या धारणेतून मुस्लिम धर्मातील विशिष्ट समाजाबद्दल निर्माण झालेला द्वेष हेच विषप्रयोगाचे कारण ठरल्याचे तपासातून पुढे आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

मोहरमच्या गर्दीमुळे विषप्रयोगाचा कट

पोलिस कोठडीत असलेल्या फय्याज याच्या चौकशीत त्याच्या वैवाहिक व कौटुंबिक अस्थिरतेविषयी माहिती मिळाली आहे. चार वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला. मात्र, पत्नी सोडून गेली. भाऊ, वहिनी, कुटुंबीय प्रेमाने वागवत नसल्याने तो मानसिक दडपणात होता. वेगवेगळ्या प्रकारची औषधे आणि गोळ्या याचे तो सेवन करायचा. ही सर्व परिस्थिती आपल्या समाजामुळेच झाल्याची भावना फय्याजच्या मनात होती. पत्नी सोडून जाण्यास, कौटुंबिक अस्थिरतेला समाजच कारणीभूत असल्याचे त्याला वाटायचे. याचाच सूड उगवण्यासाठी तो संधीची वाट पाहत होता. मोहरमला गर्दी उसळत असल्याने याच वेळी विषप्रयोग करण्याचे त्याने ठरवल्याचे तपासातून समोर आले.

…तर अनेकांच्या जीवाशी खेळ झाला असता

फय्याज याने दिलेली कॅप्सूल खाल्ल्याने सलमान यांची प्रकृती ढासळली. घरी पोहोचलेल्या सलमान यांनी तब्येत खालावल्याने डोंगरीतील रुग्णालयात जायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी डोंगरीतील इमामवाडा परिसरातील शिया समाजातील नेत्यांना याबाबत कळवले. त्यानंतर या नेत्यांनी जुलूसमध्ये अनेकांना कळवले. त्यामुळे अनेकांनी फय्याजने दिलेली कॅप्सूल खाल्ली नाही. सलमान यांनी कळवलेच नसते, तर अनेकांना त्रास झाला असता.
Maharashtra TimesPune Crime : ना 17 करोडचा महाल, ना दोन चार्टर्ड विमानं बूक; माझी ऐपत 4 कोटींची, वऱ्हाडींवर पर कपल 81 हजार खर्च, सियाच्या बाबांचा हिशोब

दहशतवादाशी संबंध नाही

आपल्याच समाजाबद्दल द्वेष असला, तरी फय्याज धर्मांध, कट्टरपंथीय नाही. तो कोणत्याही दहशतवादी संघटनांच्या संपर्कात नसल्याचे तपासात आढळले आहे. त्याने इराक आणि इराण वारी केल्याने अजूनही कोणतीही शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहानिशा करण्यासाठी सर्व बाजूने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचा मोबाइल तपासणीसाठी न्यायवैद्यक शाळेकडे पाठवण्यात आला असून, गेल्या काही दिवसांत इंटरनेटद्वारे केलेल्या हालचाली, संपर्क याची माहिती जाणून घेतली जात आहे.

उद्धव ठाकरे सेनामुक्त महाराष्ट्र, जे उरलंय ते सांभाळा; गिरीश महाजनांचा पलटवार

पुण्यात कुटुंबाची चौकशी

पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. की आरोपी फय्याज प्रेमजी याच्या पुण्याच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात उंदीर होते. या उंदरांचा नायनाट करण्यासाठी तो नियमितपणे ‘झिंक फॉस्फाइड’ या विषारी रसायनाचा वापर करीत असे. मुंबईतील मोहरम मिरवणुकीत कथित विषारी कॅप्सुल वाटप प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रविवारी पुण्यातील विमानतळ परिसरातील फय्याज प्रेमजी याच्या घरी जाऊन चौकशी केली. या वेळी त्याचे आई-वडील आणि भावाची सुमारे पाच ते सहा तास कसून चौकशी करण्यात आली.

दोन वर्षांपासून मुंबईत वास्तव्य

तपास यंत्रणांनी आरोपीच्या कुटुंबीयांकडून त्याच्या हालचाली, संपर्क, राहण्याची पद्धत; तसेच अलिकडील व्यवहारांबाबत माहिती घेतली. घराची पाहणी करून काही आवश्यक माहितीही संकलित करण्यात आली. प्राथमिक तपासानुसार, फैयाज प्रेमजी हा मूळचा पुण्यातील विमानतळ परिसरातील रहिवासी आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून तो कुटुंबापासून वेगळा राहत असून, मुंबईत वास्तव्यास होता. या काळात त्याचे नेमके कोणाशी संबंध होते; तसेच त्याच्या हालचालींचा तपास यंत्रणा शोध घेत आहेत.
Maharashtra TimesMayank Lohar : मयंकचा जीव धोक्यात, बाकीच्या प्रवाशांनी रोशनला धरलं का नाही? सर्वांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षदर्शीने दिलं; डब्यात एकच गोंधळ उडाला
मुंबई पोलिसांनी शुक्रवारी भायखळा परिसरातील मोहरम मिरवणुकीदरम्यान फैयाज प्रेमजी याला ताब्यात घेतले होते. तो हर्बल पेनकिलर असल्याचे सांगून भाविकांना कॅप्सुल वाटत होता. मात्र, त्या कॅप्सुलमध्ये उंदीर मारण्यासाठी वापरले जाणारे झिंक फॉस्फेट असल्याचे तपासात समोर आले. त्याच्याकडून १४ हजार ९०० कॅप्सूल जप्त करण्यात आल्या असून, ५० किलो झिंक फॉस्फेट पावडर आणि ३० हजार रिकाम्या कॅप्सूलची ऑनलाइन मागणी केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आरोपीचा नेमका उद्देश काय होता, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास मुंबई पोलिस आणि एटीएसकडून सुरू आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा